आज ३ मार्चला खग्रास चंद्रग्रहण; मंदिरांचे दरवाजे का बंद ठेवतात?
भारतभर दिसणाऱ्या चंद्रग्रहणाच्या काळात देव झाकण्यामागील धार्मिक आणि शास्त्रीय कारणे जाणून घ्या.

- Lunar Eclipse 2026
- चंद्रग्रहण ३ मार्च २०२६
- चंद्रग्रहण वेळ
- सुतक काळ
Lunar Eclipse 2026
आज ३ मार्च २०२६ रोजी वर्षातील पहिले खग्रास चंद्रग्रहण लागणार आहे. हे ग्रहण भारतातूनही स्पष्टपणे दिसणार असल्याने धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
ग्रहणाचा काळ सुरू होताच अनेक मंदिरांमध्ये दरवाजे बंद केले जातात, तर घरातील देव्हाऱ्यालाही पडदा लावून मूर्ती झाकण्याची परंपरा पाळली जाते. या कृतीमागे केवळ श्रद्धा नाही, तर शास्त्र आणि परंपरेशी निगडित काही कारणे आहेत.

भारतीय परंपरेनुसार ग्रहणाचा काळ संवेदनशील मानला जातो. पौराणिक कथांमध्ये राहू-केतू यांचा उल्लेख येतो. ग्रहणावेळी या ग्रहांचा प्रभाव वाढतो आणि वातावरणात नकारात्मक ऊर्जा पसरते, असे मानले जाते.
हेही वाचा-भेसळयुक्त दूध घरच्या घरी ओळखण्याचे सोपे उपाय
मंदिरातील किंवा देवघरातील मूर्तींमध्ये ‘प्राणप्रतिष्ठा’ केलेली असल्याने त्या सजीव ऊर्जेचे प्रतीक मानल्या जातात. त्यामुळे या ऊर्जेवर कोणताही विपरीत परिणाम होऊ नये म्हणून मूर्ती वस्त्राने झाकल्या जातात.
https://en.wikipedia.org/wiki/March_2026_lunar_eclipse
ग्रहणाच्या आधी ‘वेध’ किंवा ‘सुतक’ काळ सुरू होतो. या काळात पूजा-अर्चा, स्पर्श किंवा कोणतेही शुभकार्य टाळले जाते. वातावरण अशुद्ध मानले जात असल्यामुळे देवळांचे दरवाजे बंद ठेवले जातात. श्रद्धेनुसार, देवतेला या काळात विश्रांती दिली जाते आणि भक्तांनी केवळ नामस्मरण किंवा मानसिक जप करावा, अशी शिफारस केली जाते.
काही धार्मिक ग्रंथांमध्ये असेही नमूद आहे की ग्रहणावेळी निर्माण होणाऱ्या सूक्ष्म लहरींचा परिणाम धातू किंवा पाषाणाच्या मूर्तींवर होऊ शकतो. म्हणूनच संरक्षणाच्या दृष्टीने त्यांना झाकण्याची परंपरा आहे. जसे अन्नावर तुळशीचे पान ठेवून ते पवित्र ठेवले जाते, तसेच देवतांचे रक्षण करण्यासाठी पडदा लावला जातो.
ग्रहणानंतरचे विधी
ग्रहण संपल्यानंतर तत्काळ मंदिर उघडले जात नाही. सर्वप्रथम देवघर किंवा मंदिराची स्वच्छता केली जाते. त्यानंतर मूर्तींना शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक केला जातो. ताजे नैवेद्य अर्पण करून नियमित पूजा पुन्हा सुरू केली जाते. घराघरांतही ग्रहण सुटल्यानंतर स्नान करून देवपूजा करण्याची प्रथा आहे.
चंद्रग्रहणाची वेळ (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
ग्रहणाची सुरुवात (Penumbral Phase): दुपारी १:४२
खंडग्रास प्रारंभ (Partial Phase): दुपारी २:५०
खग्रास प्रारंभ (Total Phase): दुपारी ४:०४
ग्रहणाचा मध्य: सायंकाळी ४:५४
खग्रास समाप्त: सायंकाळी ५:४४
ग्रहणाचा मोक्ष: सायंकाळी ६:५८
(भारतात वेध काळ सकाळी ६ वाजल्यापासून पाळला जाईल.)
ग्रहण ही खगोलशास्त्रीय घटना असली तरी भारतीय संस्कृतीत तिचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व मोठे आहे. श्रद्धा, परंपरा आणि विज्ञान यांचा संगम या दिवशी अनुभवायला मिळतो.
नोट-सदरील माहिती इंटरनेटच्या माध्यमातून गोळा केलेली आहे ही फक्त आपल्या ज्ञानात भर टाकण्यासाठी आहे आम्ही कुठलाही सल्ला देत नाही







