Advertisement
राजकीय बातम्या

केंद्र सरकारने भंगार विकून कमावले 800 कोटी रुपये

स्वच्छता अभियानाचा विक्रम!

Advertisment

केंद्र सरकारने भंगार विकून कमावले तब्बल 800 कोटी रुपये!

 

केंद्र सरकारने मागील महिन्यात स्वच्छता अभियान अंतर्गत विविध सरकारी विभागांमधील भंगार विकून तब्बल 800 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ही आतापर्यंतची भंगार विक्रीतून झालेली सर्वात मोठी कमाई मानली जात आहे.

Advertisement

 

Advertisement
केंद्र सरकार भंगार विक्री 800 कोटी
केंद्र सरकार भंगार विक्री 800 कोटी

स्वच्छता अभियानाचा यशस्वी टप्पा

 

सन 2021 पासून 2025 पर्यंत हे स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले. या मोहिमेत सरकारी कार्यालयांमध्ये तसेच खरेदी केलेल्या आणि नंतर भंगार झालेल्या वस्तूंची विक्री करण्यात आली.

 

ही संपूर्ण प्रक्रिया केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया, केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू आणि केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या देखरेखीखाली पार पडली.

 

अभियानातील प्रमुख कामगिरी

 

या अभियानात एकूण 23.62 लाख सरकारी कामांचे परीक्षण करण्यात आले. अभियान पूर्ण झाल्यानंतर जवळपास 928.84 लाख चौरस फूट जागा रिकामी करण्यात आली.

 

 

यामध्ये 167 लाख फाइल्स छाटून त्यांना बंद करण्यात आले आणि नंतर त्यांची भंगार विक्री करण्यात आली. आतापर्यंत केंद्र सरकारने भंगार विक्रीतून एकूण 4100 कोटी रुपये मिळवले असून, यंदा हा आकडा 800 कोटी रुपयांचा आहे.

ही ही वाचा-बँक लॉकर खरंच सुरक्षित आहेत का?

हेही वाचा-RBI silver loan- आता चांदीवर देखील मिळणार कर्ज

11.58 लाख कार्यालयांची स्वच्छता

 

स्वच्छता अभियानाचा अलीकडचा टप्पा 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान राबविण्यात आला. या काळात 232 लाख चौरस फूट जागा रिकामी करण्यात आली आणि 29 लाख फाइल्स छाटण्यात आल्या.

 

 

हा आतापर्यंतचा सर्वात मोठा अभियान ठरला असून, यात केंद्र सरकारच्या 11.58 लाख कार्यालयांचा सहभाग होता. हे अभियान एकूण 84 मंत्रालये आणि विभागांमध्ये राबविले गेले.

 

फाइल्स आता डिजिटल स्वरूपात

 

या भंगार विक्रीपूर्वी सर्व महत्त्वाच्या फाइल्स डिजिटल स्वरूपात सुरक्षित करण्यात आल्या होत्या. त्यानंतरच त्यांची भंगार विक्री करण्यात आली. यासोबतच अन्य साहित्यही विकण्यात आले आहे.

https://youtube.com/shorts/KftEiX2zdbQ?feature=share

निष्कर्ष

 

भारताच्या चांद्रयान-3 मिशनसाठी फक्त 615 कोटी रुपये खर्च झाले होते, आणि केंद्र सरकारने केवळ भंगार विकून 800 कोटी रुपये कमावले.

 

या बातमीनंतर पाकिस्तानातील माध्यमांमध्ये चर्चेचा विषय झाला आहे की, पाकिस्तान आयएमएफकडून कर्ज घेत आहे, तर भारत आपला भंगार विकूनही नफा कमावत आहे!

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button