रुग्णालयातच झाले लग्न! आगीत भाजलेल्या वधूची साथ न सोडता नवरदेवाने जिंकली मने
मेहंदी समारंभात भीषण आग लागून वधू गंभीर जखमी झाली, पण नवरदेवाने थेट रुग्णालयात जाऊन घेतले सात फेरे

Marriage in Kanpur Hospital
राजश्री प्रोडक्शनचा गाजलेला चित्रपट ‘विवाह’ हा 2006 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाची कथा अशी होती की एका जोडप्याचे लग्न ठरते आणि लग्नाच्या आधी एका अपघातात नवरी मुलगी भाजली जाते.
तिला रुग्णालयात दाखल करण्यात येते आणि तिथे जाऊन तो नवरदेव तिच्याशी लग्न करतो. हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला होता. प्रश्न असा पडतो की, असा अपघात जर खरोखर घडला तर कोणी त्या मुलीशी लग्न करेल का? असाच एक अपघात घडला आणि त्या नवरदेवाने थेट दवाखान्यात जाऊन त्या मुलीशी लग्न केले. नेमके काय घडले ते पाहूया.

कानपूर रुग्णालयात लग्न
उत्तर प्रदेशातील कानपूरच्या घाटमपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर सर्वांच्या डोळ्यात अश्रू आणणारा एक विवाहसोहळा पार पडला. आगीत भाजलेली वधू गरिमा कानपूरच्या जाजमऊ येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होती,
पण वर विकास या कठीण परिस्थितीतही तिच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. गुरुवारी रात्री उशिरा तो थेट रुग्णालयात गेला आणि तिथेच विवाहाचे विधी पार पाडण्याचा निर्णय घेतला.
रुग्णालय प्रशासन आणि कुटुंबीयांच्या पाठिंब्याने रुग्णालयाचेच एका विवाहस्थळात रूपांतर झाले होते. वर हार घालून रुग्णालयात दाखल झाला, जिथे गंभीर जखमी वधू गरिमा एका सोफ्यावर आधाराने बसली होती.
हेही वाचा-सुशांत सिंग राजपूतची ‘कार्बन कॉपी’ सोशल मीडियावर व्हायरल; चाहते म्हणाले- “हा निसर्गाचा चमत्का
हेही वाचा-‘No PUC No Petrol’ नियम लागू; PUC नसलेल्या वाहनांना मिळणार नाही पेट्रोल-डिझेल
कुटुंबीय आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत जोडप्याने एकमेकांना हार घातले आणि सात फेरे घेत विवाहबंधनात अडकले. या भावनिक क्षणाने रुग्णालयात उपस्थित असलेल्या अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले. रुग्णालयाचे कर्मचारीसुद्धा या लग्नाचे पाहुणे बनले होते.
अपघातामुळे वधूच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
वधूचे वडील जगदीश यांनी सांगितले की, अपघातानंतर ते पूर्णपणे खचले होते आणि आपल्या मुलीचे लग्न कसे होणार याची त्यांना चिंता होती. मात्र, त्यांचे जावई विकास यांनी अभिमान वाटावा असे काम केले.
त्यांनी सांगितले की, काहीही झाले तरी गरिमाला साथ देण्याचे वचन विकासने दिले आहे. गरिमावर सध्या उपचार सुरू असून तिला पूर्णपणे बरे होण्यासाठी सुमारे 10 दिवस लागतील, असा डॉक्टरांचा अंदाज आहे. त्यानंतर तिचे विधिवत लग्न लावून दिले जाईल.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
खरे तर, 13 मे रोजी घाटमपूरच्या जगन्नाथपूर गावात गरिमाच्या मेहंदी समारंभादरम्यान गॅस गळतीमुळे आग लागली. झालेल्या चेंगराचेंगरीत भट्टीतील गरम तेल अनेक लोकांवर सांडले, ज्यामुळे अंदाजे 12 जण भाजले. या अपघातात वधू गरिमा आणि तिचे वडीलही गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंब मोठ्या धक्क्यात होते.
नवरदेवाने रुग्णालयात केले लग्न
दरम्यान, नवरदेव विकासने संवेदनशीलता आणि माणुसकीचा आदर्श घालून देत वरात गावात नेण्याऐवजी थेट रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला. त्याने गरिमाच्या वडिलांना सांगितले की, काहीही झाले तरी तो गरिमाशीच
लग्न करेल आणि ती पूर्णपणे बरी झाल्यानंतरच पुढील विधी पार पडतील. हे अनोखे लग्न आता संपूर्ण गावात चर्चेचा विषय बनले आहे.







