Shahpur Kandi Dam-ऐन उन्हाळ्यात पाकिस्तानच्या घशाची कोरड वाढणार?
पाकिस्तानला जाणारे पाणी थांबणार?पाकिस्तानच्या शेतीवर होऊ शकतो मोठा परिणाम

Shahpur Kandi Dam-पाकिस्तानला जाणारे पाणी बंद होणार? रावी नदीवरील शहापूर कंडी बंधारा 31 मार्चपर्यंत पूर्ण होणार
भारतातून पाकिस्तानमध्ये जाणाऱ्या रावी नदीचे अतिरिक्त पाणी आतापर्यंत थेट पाकिस्तानमध्ये जात होते. मात्र आता भारतात तयार होत असलेला शहापूर कंडी बंधारा 31 मार्च 2026 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे भारतातून पाकिस्तानमध्ये जाणारे अतिरिक्त पाणी आता भारतातच थांबणार आहे. यामुळे आधीच पाण्याच्या समस्येला सामोरे जाणाऱ्या पाकिस्तानवर आणखी एक संकट येऊ शकते.
मिळालेल्या माहितीनुसार, रावी नदीवरील या बंधाऱ्यामुळे पाकिस्तानला शेतीसाठी मिळणारे पाणी कमी होऊ शकते.

पाकिस्तानच्या अडचणींमध्ये वाढ
पूर्वीपासूनच पाकिस्तान कर्जावर चालणारा देश आहे. या देशातील सुमारे 80 टक्के शेती सिंधू नदीवर अवलंबून आहे आणि त्यावरच त्यांची अर्थव्यवस्था देखील मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. भारतातून जाणाऱ्या नद्यांमुळे पाकिस्तानला शेतीसाठी पाणी मिळते.
हे ही वाचा-Income Tax Rule Change 2026: 12 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त, नोकरदारांचा पगार वाढणार
है ही वाचा-पत्नीसोबत खाते उघडा आणि दरमहा ₹9,250 मिळवा! पोस्ट ऑफिस MIS योजनेचा मोठा फायदा
जर भारताने रावी नदीचे पाणी अडवले, तर त्याचा थेट परिणाम पाकिस्तानच्या शेतीवर होईल. यामुळे त्या देशातील शेतकऱ्यांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. भारतातून पाकिस्तानमध्ये जाणाऱ्या प्रमुख नद्यांमध्ये सिंधू, झेलम, चिनाब आणि रावी या नद्यांचा समावेश होतो.
पाणी कमी होण्याच्या भीतीमुळे पाकिस्तानातील शेतकरी चिंतेत आहेत. मात्र, या विषयावर पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर मुद्दा उपस्थित करू शकतो.
शहापूर कंडी बंधाऱ्यामुळे शेतीला फायदा
जम्मू-काश्मीर सरकारचे मंत्री जावेद अहमद राणा यांनी सांगितले की, या बंधाऱ्याचा मुख्य उद्देश कठुआ आणि सांबा जिल्ह्यांमध्ये सिंचन व्यवस्था सुधारण्याचा आहे. बंधारा पूर्ण झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये जाणारे अतिरिक्त पाणी भारतातच वापरले जाईल.
जम्मू-काश्मीर आणि पंजाब या दोन राज्यांमधील वादामुळे या प्रकल्पाला विलंब झाला होता. मात्र आता हे काम 31 मार्चपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
हायड्रो प्रोजेक्टवर काम सुरू
या बंधाऱ्यावर (Shahpur Kandi Dam)जलविद्युत प्रकल्प देखील उभारला जात आहे. यापूर्वी अतिरिक्त पाणी पाकिस्तानमध्ये जात होते, मात्र आता धरण पूर्ण झाल्यानंतर हे पाणी भारतातच साठवले जाईल.
शहापूर कंडी बंधारा प्रकल्पाची संकल्पना(Shahpur Kandi Dam) 1979 मध्ये मांडण्यात आली होती. पंजाब आणि जम्मू-काश्मीरच्या सीमेजवळ असलेल्या रणजीत सागर धरणाच्या खालच्या बाजूला हा बंधारा आहे.
या प्रकल्पासाठी करार करण्यात आला होता. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1982 मध्ये या प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते आणि 1988 पर्यंत काम पूर्ण होण्याची अपेक्षा होती.
रणजीत सागर धरणाचे काम 2001 मध्ये पूर्ण झाले. मात्र शहापूर कंडी बंधाऱ्याचे(Shahpur Kandi Dam) काम काही काळ थांबले होते. त्यामुळे अतिरिक्त पाणी पाकिस्तानमध्ये जात राहिले. 2008 मध्ये हा प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला आणि 2013 मध्ये पुन्हा कामाला सुरुवात झाली.
31 मार्चपर्यंत काम पूर्ण होणार?
पंजाब आणि जम्मू-काश्मीरमधील वाद डिसेंबर 2018 मध्ये मिटला. त्यानंतर केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी आर्थिक मदत जाहीर केली. सध्या हे काम वेगाने सुरू असून 31 मार्च 2026 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
या प्रकल्पामुळे एप्रिलपासून 32 हजार हेक्टर जास्त जमिनींना पाणीपुरवठा होणार आहे. तसेच पंजाबमधील सुमारे 5 हजार हेक्टर जमिनींना याचा लाभ होईल.







