भारतीय रेल्वेचे नवे नियम: उशिरा तिकीट रद्द केल्यास परतावा बंद, दंडात मोठी वाढ
३० मिनिटांपर्यंत बोर्डिंग पॉईंट बदलण्याची मुभा; दलालांवर नियंत्रणासाठी कठोर निर्णय

Railway New Rules 2026
भारतातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा बदल जाहीर करण्यात आला आहे. भारतीय रेल्वे ने तिकीट रद्द करण्याच्या नियमांमध्ये मोठी सुधारणा करत नवीन धोरण लागू केले आहे.

या बदलांमुळे उशिरा तिकीट रद्द करणाऱ्या प्रवाशांना अधिक आर्थिक फटका बसू शकतो, तर दुसरीकडे बोर्डिंग पॉईंट बदलण्याची सुविधा अधिक लवचिक करण्यात आली आहे.

नवीन नियमांनुसार, प्रवासाच्या ७२ तासांपेक्षा आधी तिकीट रद्द करणाऱ्या प्रवाशांना सर्वाधिक परतावा मिळणार आहे. अशा वेळी केवळ एक निश्चित रद्दीकरण शुल्क आकारले जाईल. मात्र, प्रवासाची वेळ जसजशी जवळ येते, तसतसे परताव्याचे प्रमाण कमी होत जाते.
https://contents.irctc.co.in/en/eticketCancel.html
जर प्रवासी ७२ तास ते २४ तासांच्या दरम्यान तिकीट रद्द करत असतील, तर भाड्यातून किमान शुल्कासह २५ टक्के कपात केली जाईल. त्यानंतर २४ ते ८ तास आधी तिकीट रद्द केल्यास, प्रवाशांना तिकिटाच्या भाड्याच्या ५० टक्के रक्कम गमवावी लागेल.
हेही वाचा-“विमान प्रवाशांसाठी मोठी दिलासा! 48 तासांत तिकीट रद्द करा, एकही रुपये शुल्क नाही”
हेही वाचा-शुगर पेशंट ने दर सहा महिन्याला कोणत्या टेस्ट केल्या पाहिजे?
सर्वात कठोर नियम म्हणजे, ट्रेन सुटण्याच्या ८ तासांपेक्षा कमी वेळेत तिकीट रद्द केल्यास कोणताही परतावा मिळणार नाही. यामुळे शेवटच्या क्षणी तिकीट रद्द करण्यावर मोठा आळा बसणार आहे.
दरम्यान, प्रवाशांच्या सोयीसाठी एक महत्त्वाचा दिलासा देण्यात आला आहे. आता प्रवासी ट्रेन सुटण्याच्या ३० मिनिटांपर्यंत आपले बोर्डिंग स्टेशन बदलू शकतात. यामुळे विशेषतः मोठ्या शहरांतील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
या निर्णयामागे दलालांकडून होणारा गैरवापर रोखणे हे प्रमुख कारण असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, काही दलाल मोठ्या प्रमाणात तिकिटे बुक करून शेवटच्या क्षणी रद्द करत होते आणि परतावा घेत होते. नवीन नियमांमुळे अशा प्रकारांना आळा बसण्याची अपेक्षा आहे.
पूर्वीच्या नियमांनुसार, ४८ तासांपूर्वी तिकीट रद्द केल्यास निश्चित शुल्क आकारले जात होते, तर १२ तासांच्या आत रद्द केल्यास ५० टक्के कपात केली जात होती. आता ही संपूर्ण रचना बदलून अधिक कठोर आणि टप्प्याटप्प्याने लागू करण्यात आली आहे.
या बदलांमुळे प्रवाशांनी आपला प्रवास नियोजन अधिक काळजीपूर्वक करणे आवश्यक झाले आहे. तसेच रेल्वे प्रशासनाला रिकाम्या जागांचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.







