रेशन कार्ड मोठे अपडेट : ‘मिशन सुधार’मुळे ३ प्रकारची रेशन कार्ड बंद होणार?
तुमचे रेशन कार्ड सुरक्षित आहे का? सविस्तर माहिती वाचा.

रेशन कार्डधारकांनी सावध राहा! ‘मिशन सुधार’मुळे हजारो कार्ड रद्द होण्याची शक्यता
मुंबई : राज्यातील लाखो रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील गैरप्रकार थांबवण्यासाठी आणि केवळ पात्र लाभार्थ्यांनाच मोफत धान्याचा लाभ मिळावा यासाठी राज्य शासनाने ‘मिशन सुधार’ हे विशेष अभियान सुरू केले आहे. या मोहिमेमुळे अनेकांचे रेशन कार्ड थेट रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या अभियानाअंतर्गत मृत व्यक्तींच्या नावावरील रेशन कार्ड, एकाच व्यक्तीच्या दुबार नोंदी तसेच संशयास्पद लाभार्थ्यांची सखोल तपासणी केली जात आहे. आधार क्रमांक, कुटुंबातील सदस्यांची संख्या, वास्तव्यास असलेली व्यक्ती आणि कागदपत्रांच्या आधारे शिधापत्रिकांचे शुद्धीकरण सुरू आहे.
हेही वाचा –लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीबाबत मोठा निर्णय
हेही वाचा-षट्कर्म म्हणजे काय? नेतीसह षट्कर्मांचे प्रकार, फायदे व योग्य पद्धत
तालुका स्तरावर पुरवठा निरीक्षक घरोघरी जाऊन तपासणी करत असून, यामध्ये अनेक ठिकाणी गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. अनेक कुटुंबे स्थलांतरित असतानाही धान्य उचल सुरू असल्याचे, तर काही ठिकाणी मृत व्यक्तींच्या नावावर लाभ घेतला जात असल्याचे उघड झाले आहे.
https://en.wikipedia.org/wiki/Ration_card_(India)
या सर्व तपासणीनंतर संशयास्पद प्रकरणांचा अंतिम निर्णय तहसीलदार स्तरावर घेतला जाणार आहे. विशेषतः प्राधान्य गट (PHH) आणि अंत्योदय अन्न योजना (AAY) अंतर्गत असलेल्या रेशन कार्डांवर अधिक लक्ष दिले जात आहे. नियमबाह्य बाबी आढळल्यास संबंधित कार्ड कायमस्वरूपी रद्द होणार आहे.
शासनाच्या या कठोर भूमिकेमुळे अपात्र लाभार्थ्यांना फटका बसणार असला तरी, खऱ्या गरजू कुटुंबांना वेळेवर आणि पुरेसे धान्य मिळण्यास मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे रेशन कार्डधारकांनी आपली माहिती अद्ययावत ठेवणे आणि तपासणीदरम्यान सहकार्य करणे अत्यंत गरजेचे ठरणार आहे.
मिशन सुधार मळे जे लोक मृत पावलेले आहेत त्यांची नावे एकाच व्यक्तीचे दोन राशन कार्ड वर नावे तसेच काही संशयास्पद असलेले नावे वगळण्यात येणार आहेत यामुळे राशन कार्डधारकांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे
यामुळे गरजू लोकांना वेळेवर राशन मिळेल व त्यांना पुरेसे अन्न मिळण्यासाठी मदत होईल शासनाच्या अन्नसुरक्षा अभियान याचा लाभ गरजू लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचेल त्यामुळे मिशन सुधार महत्त्वाचे असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे
याआधी पण गॅस कनेक्शन राशन कार्डशी जोडणे त्यानंतर या प्रक्रियेमुळे बोगस लाभार्थी वगळले जातील व खऱ्या लाभार्थ्यांना शासनाच्या योजनेचा फायदा मिळेल यामुळे ही योजना महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे अशी राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे







