केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्प (BUDGET) जाहीर केला आणि या अर्थसंकल्पामधून नेमकं देशवासियांना काय मिळाले आहे आणि याचा फायदा किती होणार आहे नवी कर प्रणाली काय आहे शेतकऱ्यांना काय मिळाले
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन(FINANCE MINISTER NIRMALA SITHARAMAN)जेव्हा संसदेमध्ये देशाचे 2025-2026 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प (BUDGET) सादर करत होत्या तेव्हा देशातील उद्योजकांचे,जनसामान्यांचे,शेतकऱ्यांचे,मजूरदारांचे सर्वांचेच लक्ष हे अर्थमंत्र्याच्या अर्थसंकल्पाच्या भाषणावर होते कारण पुढील एक वर्षासाठी नेमकी देशाची आर्थिक परिस्थिती कशी असेल व त्याचा फायदा किंवा तोटा हा जन माणसाला कसा होईल या सर्व अपेक्षा भारतीयांच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन(FINANCE MINISTER NIRMALA SITHARAMAN)यांच्याकडे होते यामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन(FINANCE MINISTER NIRMALA SITHARAMAN)यांनी अनेकांना आश्चर्याची धक्के देखील दिले नेमकं या अर्थसंकल्पामध्ये काय विशेष होतं या बाबी आपण पाहूया

बारा लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त (Income tax free up to twelve lakhs)
नवीन कर प्रणाली जाहीर करत असताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन(FINANCE MINISTER NIRMALA SITHARAMAN)यांनी जनतेच्या अपेक्षेच्या बरच पुढे जाऊन बारा लाखापर्यंतचे उत्पन्न हे करमुक्त केले व हे उत्पन्न करमुक्त कसे असेल हे अर्थमंत्री निर्मला सीतारामन(FINANCE MINISTER NIRMALA SITHARAMAN)यांनी उदाहरणासहित स्पष्ट केले वेगळी भांडवली उत्पन्न नसणाऱ्या करदात्यांना बारा लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कर देण्याची गरज नाही. नवीन कराच्या पद्धतीनुसार जर एखाद्या करदात्याचे उत्पन्न हे जर 12 लाखापर्यंतचे असेल तर त्याला कर देण्याची गरज नाही पण जर त्याकरदात्याची उत्पन्न हे बारा लाख 80 हजार असेल तर मात्र त्या करदात्याला ठरवल्याप्रमाणे पाच किंवा दहा किंवा पंधरा अशा स्तरानुसार कर लागू होईल आता याला आपण थोडं सोप्या भाषेत समजून घेऊया पण समजा एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न हे 12 लाख 80 हजार च्या वर 1000 जरी असेल तर त्याला संपूर्ण उत्पन्नावर आयकर भरावा लागेल
हे हि वाचा-agriculture news budget 2025 अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना मिळणार दिलासा ?
नवीन कर प्रणालीमुळे संभ्रम कशामुळे(Why the new tax system is causing confusion)
बारा लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त करणारा असे निर्मला सीतारामन यांनी जाहीर केले असले तरी पुढे अर्थमंत्री निर्मला सीतारामन(FINANCE MINISTER NIRMALA SITHARAMAN)यांनी असे सांगितले की चार ते आठ लाख पर्यंतच्या उत्पन्नावर पाच टक्के कर आणि आठ ते बारा लाखापर्यंतच्या उत्पन्नावरती दहा टक्के कर या घोषणेमुळेच करदात्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे पण याचा अर्थ असा होतो की बारा लाख रुपये वार्षिक उत्पन्नाची असलेल्या करदात्यांना 75 हजार रुपयांचे स्टॅंडर्ड डिडक्शन लागू केले जाणार आहे ? त्यामुळे चार लाख ते बारा लाखापर्यंतच्या स्लॅब मधील करदात्यांना पाच ते दहा टक्के हा कर आकारला जाणार आहे तो कर आता स्टॅंडर्ड डिडक्शन मधून निल केला जाणार आहे त्यामुळेच जरी सरकारने पाच दहा व पंधरा टक्के कर जाहीर केला असला तरी कर भरण्याची गरज नाही

नवीन कर प्रणालीमुळे सरकारी तिजोरीवर तब्बल एक लाख कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे असा अंदाजा अर्थतज्ञ व्यक्त करत आहेत तर दुसरीकडे या गोष्टीला याही पद्धतीने पाहता येईल की तिजोरीवर पडणारा हा बोजा एक लाख कोटी रुपयांचा तो आता करदात्यांच्या खिशात जाणार आहे त्यामुळे मार्केटमध्ये अतिरिक्त मागणी तयार होईल त्या रूपात परत सरकारला कर मिळेल ?
गंभीर आजारांचे औषधे स्वस्त होणार(Medicines for serious diseases will be cheaper)
कॅन्सर किंवा इतर गंभीर स्वरूपांच्या आजारांवर रुग्णांचे मोठ्या प्रमाणात पैसे खर्च होतात कारण की या औषधांवरील या आजारांवर मोठ्या प्रमाणात कस्टम ड्युटी लावली जाते पण या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन(FINANCE MINISTER NIRMALA SITHARAMAN) यांनी 36 जीवन आवश्यक औषधांवरील कस्टम ड्युटीला पूर्णपणे सूट दिली आहे तर इतर सहा जीवन आवश्यक औषधांवरील कस्टम ड्युटी कमी करून ती सहा टक्क्यावर आणली आहे याचा फायदा हा सामान्य रुग्णांना होणार आहे
हे हि वाचा-Union Budget 2025 News केंद्रीय अर्थसंकल्प तयार करणारे अधिकारी आणि त्यांचे काम
सरकारी शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ब्रॉडबँड ची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे यामुळे विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण घेताना याचा फायदा निश्चित होणार आहे
या अर्थसंकल्पामध्ये अंदाजे उत्पन्न हे 34.93 लाख कोटी एवढे असेल तर कर अंदाजे उत्पन्न हे 28.87 लाख कोटी तर वित्तीय तूट ही अंदाजे जीडीपी च्या 4.4 टक्के एवढी असेल ?
अर्थमंत्री निर्मला सीतारामन(FINANCE MINISTER NIRMALA SITHARAMAN)यांनी आज घोषित केलेल्या अर्थसंकल्पामध्ये अर्थसंकल्प(Budge) विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मोठी घोषणा केली आहे यामध्ये प्राईम मिनिस्टर फेलोशिप या योजने अंतर्गत आय.आय.टी.व आय.आय.एम.मधील विद्यार्थ्यांना टेक्नॉलॉजिकल रिचर्स साठी दहा हजार पीएम फेलोशिप दिल्या जाणार आहेत
तसेच वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अर्थमंत्री निर्मला सीतारामन(FINANCE MINISTER NIRMALA SITHARAMAN)यांनी एक आनंदाची घोषणा केली आहे यामध्ये देशातील मेडिकल कॉलेजमध्ये दहा हजार जागा अधिक दिल्या जाणार असल्याची घोषणा केलेली आहे यामुळे आता पुढच्या पाच वर्षांमध्ये 75 हजार विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न यामुळे पूर्णत्वाकडे जाईल
गीग वर्कर्स साठी सुद्धा अर्थमंत्री निर्मला सीतारामन(FINANCE MINISTER NIRMALA SITHARAMAN)यांनी एक महत्त्वाची योजना आणलेली आहे ते ई श्रम पोर्टलवर नोंदणी करून त्यांना एक आयकार्ड दिले जाणार आहे यासोबतच गीग वर्कर्स यांना प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेचा फायदा होणार आहे सुमारे देशभरामध्ये एक कोटी पेक्षाही जास्त गीग वर्कर्स आहेत त्यांना या योजनेचा फायदा होईल असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन(FINANCE MINISTER NIRMALA SITHARAMAN)यांनी सांगितले
एस.सी.व एस.टी.वर्गातील महिला उद्योजकांसाठी नवीन योजना(New scheme for SC and ST category women entrepreneurs)
देशातील एस.सी.आणि एस.टी.वर्गातील महिला की ज्या नव्याने आपला व्यवसाय सुरू करू इच्छितात त्यांना भरीव अर्थसहाय्य देण्यासाठी या योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे यामध्ये पाच लाख महिला उद्योजकांना दोन कोटी रुपयांचे टर्म लोन दिले जाणार आहे
तर उद्योग पोर्टलवर नोंदणी असलेल्या सूक्ष्म उद्योगांना पाच लाखा कर्ज देणारे क्रेडिट कार्ड दिले जाणार आहे तर लघु आणि मध्यम उद्योगांना दहा कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे तर स्टार्टअप योजनेचे क्रेडिट लिमिट हे आता वीस कोटी रुपये पर्यंत करण्यात आलेले आहे याचा फायदा देशातील उद्योजकांना निश्चित होईल असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन(FINANCE MINISTER NIRMALA SITHARAMAN)यांनी संसदेत सांगितले

ज्ञान भारतम मिशन
ज्ञान भारतम मिशन ही एक नाविन्यपूर्ण योजना सरकार चालू करत आहे ज्या योजनेच्या माध्यमातून भारतातील जुने सरकारी दस्ताऐवज तसेच ऐतिहासिक हस्तलिखिते यांचा शोध घेऊन नंतर त्यांचे जतन केले जाईल व त्याचे डॉक्युमेंटेशन केले जाईल यामुळे आपल्या पुरातन आणि सरकारी दस्तावेजांचे एका नवीन रूपामध्ये पुढच्या पिढीला वाचन करता येईल
हिल इन इंडिया(Hill in India)
हिल इन इंडिया या योजनेची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन(FINANCE MINISTER NIRMALA SITHARAMAN)यांनी केली या योजनेद्वारे भारतातील मेडिकल टुरिझम ला प्रोत्साहन देण्यात येईल म्हणजेच एखाद्या रोगाचा इलाज करण्यासाठी जे रुग्ण भारतात येऊन इच्छिता त्यांच्यासाठी ही योजना असेल यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे परदेशातून भारतामध्ये येणाऱ्या रुग्णांना विजा प्रक्रिया ही अधिक सुलभ केली जाणार आहे
हे हि वाचा-GSB DISEASE UPDATE पुणेकरांनो सावधान,GSB आजराचा धोका वाढला
तसेच अनेक घोषणा करण्यात आल्यात यामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन(FINANCE MINISTER NIRMALA SITHARAMAN)यांनी एक महत्त्वाची घोषणाही इ व्ही व्हेईकल साठी केलेली आहे यामध्ये लिथियम आयन बॅटरी व सेमी कण्डक्टर आणि अक्षय ऊर्जा योजनेसाठी वरील तीनही उद्योगांना लागणाऱ्या मशिनरीच्या निर्मितीसाठी गरज असलेले कोबाल्ट लिथियम,आयन बॅटरी स्क्रॅप,लेड झिंक व इतर अशा प्रकारच्या बारा खनिजांसाठी आयात करण्यासाठी लागणारी बेसिक कस्टम ड्युटी ही पूर्णपणे कमी करण्यात आलेली आहे त्यामुळे भविष्यामध्ये ईव्ही वेहिकल्स व संगणक यासारख्या गोष्टी आता स्वस्त होतील
अशा काही महत्वपूर्ण घोषणा या अर्थमंत्री निर्मला सीतारामन(FINANCE MINISTER NIRMALA SITHARAMAN)यांनी आज आपल्या अर्थसंकल्पीय (Budget) भाषणाच्या वेळेला केल्या एकंदरीत अर्थतज्ज्ञांच्या मते सदरील अर्थसंकल्प (Budget) हा समाधानकारक असल्याचे बोलले जात आहे तरीपण आणखीन काही गोष्टी या चांगल्या करता येऊ शकल्या असत्या असेही म्हणणं काही अर्थतज्ज्ञांचे आहे यामध्ये विशेषता पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेमध्ये कुठल्याही प्रकारची वाढ केली गेली नाही याही गोष्टीचा आश्चर्य हे सगळ्यांना वाटलं
2 Comments
Nice👍
Pingback: Budget 2025-बजेट मध्ये शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा - Sankalp Today