मुंबई महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन(Budget Session of Maharashtra Legislative Assembly) आजपासून सुरू होणार आहे या अधिवेशनामध्ये राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येईल या अधिवेशनामध्ये कोणकोणते मुद्दे गाजणार आहेत विरोधक आक्रमक का आहेत? सत्याधारी पक्षांनी कशा पद्धतीची रणनीती आखली आहे
अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session of Maharashtra Legislative Assembly)
अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे या अधिवेशनामध्ये अर्थमंत्री अजित दादा पवार(Ajit Dada Pawar) हे 2025-2026 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प मांडणार आहेत या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी किती रुपयाचे तरतूद होते याविषयी सध्या चर्चा चालू आहे राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळेल काय ? याविषयी सध्या चर्चा चालू आहे तसेच नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी किती रुपयांची आर्थिक तरतूद केली जाते हे सुद्धा पहावं लागेल अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या अर्थसंकल्पात शेतकरी,सामान्य नागरिक,नोकरदार,महिला यांना नेमका कोणता दिलासा मिळतो
अधिवेशनात विरोधक आक्रमक होणार ? (Will the opposition be aggressive in the convention?)
यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक चांगलेच आक्रमक होण्याची शक्यता आहे यामध्ये प्रमुख मुद्दे पुण्यामध्ये स्वारगेट बस स्थानकावर घडलेले बलात्काराचे प्रकरण या प्रकरणानंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलेले वक्तव्य या वक्तव्याचे पडसाद आज होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पडण्याची दाट शक्यता आहे
हे हि वाचा –agriculture news budget 2025 अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना मिळणार दिलासा ?
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण या प्रकरणावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे सीआयडीने केलेला तपास आणि दाखल केलेले आरोप पत्र त्या आरोप पत्रामध्ये वाल्मीक कराड यांचीही नाव आहे वाल्मीक कराड व धंनजय मुंढे यांची जवळीक असल्याची चर्चा आहे? त्यामुळे विरोधक मंत्री धनंजय मुंडे यांच्याही राजीनाम्याची मागणी करत आहेत राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक सत्र न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा यावरून देखील अधिवेशनामध्ये विरोधक मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करतील अशी शक्यता आहे दोन वर्ष शिक्षा झाल्यानंतर .त्या लोकप्रतिनिधीची आमदारकी रद्द होते यापूर्वी देखील राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झालेली होती
आता त्यामुळेच विरोधक माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरतील अशी शक्यता वर्तवली जात आहे अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवरायांबद्दल केलेले वक्तव्य त्या वक्तव्याचे पडसाद देखील अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पडण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी च्या आश्वासनाची पूर्तता करावी यासाठी देखील विरोधक अधिवेशनामध्ये आक्रमक होताना दिसती शेतकऱ्यांची कर्जमाफी ही झालीच पाहिजे अशी मागणी विरोधक सध्या करत आहेत राज्याच्या अर्थसंकल्प सादर होणार आहे त्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी सातत्याने विरोधकांकडून होत आहे
हाय सिक्युरिटी नंबर प्लेट 31 मार्चपर्यंत राज्यातील प्रत्येक वाहनाला हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्याचे आदेश परिवहन विभागाकडून देण्यात आले आहेत पण इतर राज्याच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रामध्ये या नंबर प्लेट दुप्पट किमतीने विकल्या जात आहेत गुजरात आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये या नंबर प्लेटच्या किमतीमध्ये दुपटीचा फरक असल्यामुळे आधीच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा पक्ष आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे तर अधिवेशनामध्ये देखील या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट मुळे विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करतील ? या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष नेता नसेल
करूना मुंढे यांची पोस्ट-https://www.facebook.com/share/p/15kkrBy7u3/
धनंजय मुंडे यांच्या राजीनामाची चर्चा ?(Discussion of Dhananjay Munde’s resignation?)
करुणा धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांनी आज फेसबुक वर एक पोस्ट टाकली ज्या पोस्टमध्ये त्यांनी आज राजीनामा येईल असं त्यांनी त्या पोस्टमध्ये टाकले आहे आणि यामुळे धनंजय मुंडे(Dhananjay Munde)राजीनामा देणार याविषयी परत एकदा चर्चा सुरू झाल्या काल झालेल्या काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये धनंजय मुंडे(Dhananjay Munde) हे उपस्थित होते धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमां मध्ये येत आहेत ? आणि अशा मध्येच करुणां मुंडे यांनी केलेल्या या पोस्टमुळे धनंजय मुंडे(Dhananjay Munde) खरंच राजीनामा देणार की काय याविषयी सध्या चर्चा सुरू झाली आहे काल झालेल्या चहा पाण्याचे कार्यक्रमांमध्ये अजित दादा पवार(Ajit Dada Pawar) यांनी धनंजय मुंडे यांना एक चकार शब्द देखील बोलला नाही असे व्हिडिओ प्रसार माध्यमांमध्ये येत आहेत करुणा मुंडे यांनी केलेली पोस्ट आणि विरोधकांचा वाढता दबाव यामुळे मंत्री धनंजय मुंडे हे आपल्या पदाचा राजीनामा देणार काय हे आता पाहावे लागेल
वरील सर्व गोष्टींचा विचार केल्यास अर्थसंकल्पीय अधिवेशन हे वादळी ठरण्याची शक्यता आहे काँग्रेस आणि सेना उद्धव ठाकरे घर या दोघांमध्ये विरोधी पक्ष नेता यावर चालू असलेली चर्चा आदमी अंतिम टप्प्यात पोहोचलेली नाही. राज्यातील कायदा व सुव्यवस्था याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे प्रतिक्रिया विजय वडिट्टीवर यांनी प्रसार माध्यमांना दिली निवडणुका संपन्न होऊन देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही या अधिवेशनामध्ये व्हावी पण राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता कर्जमाफीसाठी तरतूद या आधीवेशनात होईल की नाही? याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे अर्थ मंत्री अजित दादा पवार नेमका सर्वसामान्यांना शेतकऱ्यांना दिलासा कसा देतील हे पाहावे लागेल