मुंबई सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन विधिमंडळामध्ये चालू आहे आणि याच दरम्यान विधान परिषद(Maharashtra Legislative Council Elections) रिक्त जागांसाठी 27 मार्च रोजी मतदान होणार असल्याची घोषणा झाली आहे त्यामुळे राज्यातील पाच रिक्त विधान परिषदेच्या जागांसाठी कोणाची वर्णी लागणार कोणती नावे चर्चेत आहेत
राज्यामध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि या निवडणुकीमध्ये पाच विधान परिषदेचे आमदार हे विधानसभेवर निवडून गेले त्यामुळे या पाच जागा रिक्त झाले आहेत या पाच जागांमध्ये भारतीय जनता पार्टीचे तीन उमेदवार तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाचे एकेक आमदार विधानसभेवर निवडून गेलेले आहेत त्यामुळे या जागा रिक्त झाले आहेत
कोणते आमदार विधानसभेला निवडून गेले ?(Which MLAs were elected to the Legislative Assembly?)
राज्यामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये विधान परिषदेचे(Maharashtra Legislative Council Elections) पाच आमदार हे विधानसभेवर निवडून गेले ते आमदारांमध्ये पहिले आमदार
आमश्या पाडवी हे आहेत पाडवी हे नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील आहेत अक्कलकुवा या विधानसभा मतदारसंघांमधून त्यांनी निवडणूक लढविली व ते विजयी झाले त्यांनी काँग्रेसच्या कागडा पाडवी यांचा पराभव केला आहे जुलै 2022 ते नोव्हेंबर 2024 पर्यंत ते विधान परिषदेचे आमदार देखील होते पाडवी हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत
राजेश विटेकर
राजेश विटेकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत 2024 मधील विधानसभा निवडणुकीमध्ये पाथरी मतदारसंघांमधून ती विजयी झाले आहेत त्यांनी काँग्रेस पक्षाचे सुरेश वडपुरकर यांचा पराभव केला आहे राजेश विटेकर हे अजित दादा पवार यांचे अत्यंत विश्वासू आहेत विधानसभेवर निवडून यायच्या आधी राजेश विटेकर हे विधान परिषदेचे सदस्य होते 28 जुलै 2024 ते 23 नोव्हेंबर 2024 पर्यंत त्यांनी विधान परिषदेचे आमदार म्हणून काम देखील पाहिले आहे
प्रवीण दटके
प्रवीण दटके हे नागपूर सेंट्रल या विधानसभा मतदारसंघां मधून 2025 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी झाले आहेत त्यांनी विकास कुंभारे यांचा पराभव केलेला आहेतसेच 14 मे 2020 पासून ते विधान परिषदेचे सदस्य देखील होते
गोपीचंद पडळकर हे जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांनी 2024 च्या निवडणुकी मध्ये विक्रम सामंत यांचा पराभव केला होता याआधी देखील त्यांनी अजित दादा पवार यांच्या विरोधात बारामती विधानसभा मतदारसंघांमधून निवडणूक लढविलेली आहे पण त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता गोपीचंद पडळकर हे 14 मे 2020 रोजी विधान परिषदेवर निवडून आले होते
रमेश कराड
रमेश कराड हे लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांनी धीरज देशमुख यांचा पराभव केला आहे ते भारतीय जनता पार्टी या पक्षाचे आमदार आहेत याआधी ते विधान परिषदेचे सदस्य होते
वरील पाच विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी 27 मार्च 2025 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे यामध्ये भारतीय जनता पार्टी तीन राष्ट्रवादी काँग्रेस एक आणि शिवसेना एक
27 मार्च रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडून येणाऱ्या आमदारांचा कालावधी किती असेल कारण विधान परिषदेच्या आमदारांना सहा वर्षाचा कालावधी असतो यामध्ये विधान परिषदेवर निवडून गेलेल्या आमदारांनी जो कार्यकाळ पूर्ण केलेला आहे तो सोडून उर्वरित कार्यकाळ हा नवीन आमदारांना दिला जाईल यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जो आमदार निवडून येईल त्यांना सव्वा पाच वर्षांचा कालावधी मिळेल तसेच शिवसेना पक्षाच्या वतीने जो आमदार या निवडणुकीत विजय होईल त्यांना सव्वा तीन वर्षाचा कालावधी विधानपरिषदेवर मिळणार आहे तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने जे तीन आमदार विधान परिषदेत निवडून येतील त्यांचा कार्यकाळ हा फक्त 13 महिन्यांचा असेल
हे ही वाचा –Budget Session -विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज पासून। वेगवगळ्या मुद्या वरून विरोधक आक्रमक
निवडणूक प्रक्रिया कशी असेल ?
पाच विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी जे मतदान होणार आहे त्यामध्ये निवडून यायचा कोटा हा 57 मताचा असेल आपण राज्यातील पक्षीय बलाबल पाहिल्यास अशी लक्षात येईल की या विधान परिषदेच्या रिक्त पाचही जागी महायुतीचे उमेदवार हे सहज निवडून येतील कारण विरोधी पक्षांमध्ये असलेले काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट या तिघांचेही आमदार एकत्र केले तरीसुद्धा 57 चा आकडा गाठता येत नाही त्यामुळे महायुतीने दिलेल्या पाच उमेदवारांचा विजय हा निश्चित आहे या कारणामुळे विधान परिषदेची ही पाच जागांची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता दाट आहे
हेही वाचा –Delhi Railway Station Stampede: ‘रेल्वेची ती एक सूचना आणि चेंगराचेंगरी झाली
भाजपा कडून कोणत्या नावाची चर्चा ?(What name is being discussed by the BJP?)
भारतीय जनता पार्टी मधून सर्वात पहिले नाव जे पुढे येत आहेत यामध्ये पहिलं नाव आहे ते प्रशांत परिकर हे मंगळवेढा आणि पंढरपूर या मतदारसंघांमध्ये त्यांची राजकीय वजन ही मोठी आहे गत विधानसभा निवडणुकीमध्ये ते निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते पण भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठीचे ऐकून त्यांनी ऐन वेळेला आपले नाव मागे घेतले त्यामुळे भारतीय जनता पार्टी त्यांना या विधान परिषदा निवडणुकीमध्ये संधी देऊ शकते याबाबतीत चे संकेत स्वतः चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत
यामध्ये दुसरे नाव आहे राजेंद्र राऊत यांनी विधानसभेची निवडणूक बार्शी विधानसभा मतदारसंघांमधून लढवली जेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र पाटील यांच्यावर टीका केली तेव्हा त्या टीकेला उत्तर हे राजेंद्र राऊत यांनी दिले होते राजेंद्र राऊत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय मानले जातात त्यामुळे त्यांना देखील संधी मिळू शकते
संजय केणेकर यांचे नाव सध्या विधान परिषदेसाठी चर्चेत आहे संजय केणेकर हे मूळ छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील आहेत मागील अनेक वर्षापासून ते भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात तसेच रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस अतुल सावे यांचे निकटवर्तीय मानले जातात मागील अनेक वर्षापासून असलेली पक्षाबद्दलची एकनिष्ठता यामुळे संजय केणेकर यांना सुद्धा विधान परिषदेत आमदार होण्याची संधी मिळू शकते
निलय नाईक हे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नातू तर भारतीय जनता पार्टीचा एक मोठा चेहरा म्हणून विदर्भामध्ये प्रसिद्ध आहेत याआधी देखील भारतीय जनता पार्टीने निलय नाईक यांना विधान परिषदेवर पाठवलं होतं लोकसभा निवडणुकीच्या वेळी देखील त्यांच्या नावाची चर्चा ही मोठी होती पण त्यांचा यवतमाळ मतदार संघ हा शिवसेना शिंदे गटाकडे असल्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यामुळे विधान परिषदेवर त्यांना घेतले जाऊ शकते तसेच
भारतीय जनता पार्टीच्या वतीने केशव उपाध्याय,प्रमोद जठरा,राम सातपुते,जगदीश मुळीक,संदीप जोशी यांच्या नावाची चर्चा आहे
शिवसेनेकडून कोण होऊ शकतो आमदार ?(Who can become an MLA from Shiv Sena?)
तर शिवसेना शिंदे गटाकडून काय झाडी काय डोंगर या वाक्याने गाजलेले माजी आमदार शहाजी बापू पाटील यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे एकनाथराव शिंदे यांची अत्यंत जवळीक असलेले नेते म्हणून शहाजी बापूंकडे पाहिले जाते
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून कोणाची चर्चा ?(Who is being discussed from the Nationalist Congress Party?)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून रूपालीताई चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीचे अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस फुटी नंतर रूपाली ताई चाकणकर यांनी प्रत्येक मतदारसंघांमध्ये जाऊन महिलांचे संघटन मजबूत केले त्यामुळे रूपालीताई चाकणकर यांना विधान परिषदेची संधी मिळू शकते
दिलेली नावे ही सध्या प्रसार माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात गाजत आहेत व यापैकी कोणाची तरी वर्णी विधान परिषदेचे आमदार म्हणून लागू शकते 27 मार्च रोजी याची मतदान प्रक्रिया पार पडेल ही निवडणूक बिनविरोध व्हायची शक्यता दाट आहे