नायगाव नांदेड_नांदेड लोकसभेचे विद्यमान खासदार स्वर्गीय वसंतराव चव्हाण(Vasantrao Chavan)यांच्यावर
आज त्यांच्या मूळ गावी नायगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले याप्रसंगी हजारोचा
जनसमुदाय व अनेक राजकीय नेते मंत्री शासकीय अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते परिसरातील हजारो
गावकऱ्यांनी आपल्या लाडक्या नेत्याला शेवटचा निरोप दिला वसंतराव अमर रहे या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता
वसंतराव चव्हाण(Vasantrao Chavan) हे विद्यमान खासदार होते त्यांचा जन्म 15 ऑगस्ट 1954 रोजी नायगाव
येथे झाला लहानपणापासूनच वसंतराव(Vasantrao Chavan) अत्यंत शांत व संयमी व समाजामधील प्रत्येक घटकाला
बरोबर घेऊन चालण्याची त्यांची वृत्ती अगदी कॉलेज जीवनापासूनच त्यांना समाजकारणात मध्ये काम करण्यामध्ये रस होता
आणि यानंतर 1978 ला त्यांनी नायगावचे सरपंच म्हणून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली यानंतर
वसंतराव चव्हाण (Vasantrao Chavan)जवळपास 24 वर्षे या पदावर होते या काळामध्ये त्यांनी नायगाव चा
विकास मोठ्या प्रमाणात केला व स्वतःची एक वेगळी ओळख त्यांनी नांदेड जिल्ह्यामध्ये करून घेतली 1992 ला
वसंतराव चव्हाण हे पहिल्यांदा नांदेड जिल्हा परिषदेवर निवडून आले व ते जिल्हा परिषद सदस्य झाले याच
काळामध्ये लोहा तालुक्यातील प्रतापराव पाटील चिखलीकर हे सुद्धा जिल्हा परिषद सदस्य झाले तेव्हापासून
प्रताप पाटील चिखलीकर वसंतराव चव्हाण(Vasantrao Chavan)यांची मैत्री घट्ट झाली
नांदेड जिल्हा हा स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो तसेच काँग्रेसचे बालेकिल्ला
म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे या जिल्ह्याने महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री दिले पहिले शंकरराव चव्हाण व दुसरे
त्यांचे सुपुत्र अशोकराव चव्हाण(Ashokrao Chavan)त्यामुळे राजकीय दृष्ट्या हा जिल्हा महाराष्ट्रात अत्यंत
महत्त्वाचा मानला जातो पण वसंतराव चव्हाण यांची कारकीर्द सुरुवातीला काँग्रेस पक्षाप्रमाणे नव्हती त्यांचे आणि
अशोकराव चव्हाण यांचे संबंध राजकीय दृष्ट्या फार चांगले नव्हते ते एकमेकांची विरोधक होते म्हणूनच 2002
मध्ये शरद पवार यांच्याशी त्यांचे संबंध चांगले होते व शरद पवार यांनी वसंतराव चव्हाण यांना विधान परिषदेवर
घेतले व ते पहिल्यांदा आमदार झाले विधानपरिषद वर काम करताना त्यांनी आपल्या कामाचा प्रभाव हा
विधान परिषदेमध्ये सुद्धा दाखवला स्थानिक प्रश्नांसाठी वसंतराव चव्हाण हे विधान परिषदेमध्ये चांगलेच आक्रमक
होताना बऱ्याचदा पाहायला मिळाले व नायगाव ला तालुका करण्यामध्ये त्यांचे योगदान मोठे होते त्यांच्याच प्रयत्नांमुळे
नायगाव हा तालुका झाला पुढे 2009 मध्ये वसंतराव चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून अपक्ष म्हणून
विधानसभेची निवडणूक लढवली व या निवडणुकीमध्ये वसंतराव चव्हाण(Vasantrao Chavan) हे विजयी झाले
त्याकाळी अशोकराव चव्हाणAshokrao Chavan यांचे जिल्ह्यावर मोठे वर्चस्व होते आणि अशात वसंतराव चव्हाण
(Vasantrao Chavan)हे अपक्ष म्हणून निवडून आले व त्यांनी स्वतःच अस्तित्व सिद्ध करून दाखवलं असेही राजकीय
मंडळी सांगतात पण 2009 ते 2014 च्या दरम्यान वसंतराव चव्हाण(Vasantrao Chavan)व अशोकराव चव्हाण
यांच्यामध्ये मैत्री झाली व 2014 मध्ये वसंतराव चव्हाण(Vasantrao Chavan) यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला
त्याकाळी बाकी सर्वच पक्षांनी वसंतराव चव्हाण(Vasantrao Chavan) हे आपल्याकडे यावेत यासाठी प्रयत्न केला
पण अशोकराव चव्हाण(Ashokrao Chavan)यांनी त्यांना काँग्रेसमध्ये घेऊन 2014 च्या निवडणुकीमध्ये नायगाव
विधानसभा मतदारसंघांमधून उमेदवारी सुद्धा दिली आणि वसंतराव चव्हाण(Vasantrao Chavan)यांनी 2014
ची निवडणूक मोठ्या फरकाने जिंकली व ते काँग्रेस पक्षामध्ये एक मोठे नेते म्हणून समोर आले. विधानसभा आणि
विधान परिषदेतील त्यांची कारकीर्द पाहता 2014 च्या विधानसभेच्या लोक लेखा समितीवर वसंतराव चव्हाण
(Vasantrao Chavan)यांची नियुक्ती करण्यात आली या समितीमध्ये सुद्धा वसंतराव चव्हाण(Vasantrao Chavan)
यांनी आपली छाप इतर सर्व सदस्यांना टाकली नायगाव येथे एमआयडीसीचा प्रश्न असेल शिक्षणाचा प्रश्न असेल
यासाठी वसंतराव चव्हाण यांनी अहोरात्र काम केले एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी नायगाव तालुक्यामध्ये
ग्रामीण भागामध्ये शिक्षणाच्या सोयी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या2019 मध्ये विधानसभेच्या निवडणुका जाहीर
झाल्या व काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा वसंतराव चव्हाण यांना नायगाव विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी दिली
तर युतीने भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते कैलासवासी संभाजी पवार यांचे चिरंजीव डॉक्टर राजेश पवार यांना
भारतीय जनता पार्टीची उमेदवारी दिली वसंतराव चव्हाण(Vasantrao Chavan)विरुद्ध राजेश पवार अशी लढत
नायगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये पाहायला मिळाली यामध्ये वसंतराव चव्हाण यांचा पराभव झाला पण पराभवाने
खचून न जाता वसंतराव चव्हाण यांनी कामाचा वेग वाढविला व काँग्रेस पक्षामध्ये ते मोठे नेते म्हणून समोर येऊ लागले
2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी अशोकराव चव्हाण(Ashokrao Chavan) यांनी काँग्रेसला रामराम करत
भाजपाचे कमळ हाती घेतले अशोकराव चव्हाण(Ashokrao Chavan)यांच्यासोबत काँग्रेसचे मोठे नेते हे भारतीय जनता पार्टीमध्ये जातील
असा अंदाज होता पण वसंतराव चव्हाण हे मात्र काँग्रेस पक्षामध्येच मी राहणार असे त्यांनी ठणकावून सांगितले व त्यांनी
भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्यास नकार दिला 2024 मध्ये जेव्हा लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या व
अशोकराव चव्हाण(Ashokrao Chavan)पक्ष सोडून गेल्यानंतर नांदेड लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे अस्तित्व उरणार नाही असं काही
जणांना वाटत होतं पण उमेदवारांचा शोध चालू असताना वसंतराव चव्हाण(Vasantrao Chavan)यांनी लोकसभेची
निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली व काँग्रेस पक्षाने ही त्यांच्यावर विश्वास दाखवत 2024 मध्ये लोकसभेची
उमेदवारी ही वसंतराव चव्हाण(Vasantrao Chavan)यांना दिली
अशोकराव चव्हाण काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेल्यामुळे ही निवडणूक वसंतराव चव्हाण यांना सोपी जाणार नाही
असा अंदाजा राजकीय मंडळी बांधत होती व देशामध्ये नरेंद्र मोदी ची वारे होते व भारतीय जनता पार्टीच्या वतीने
विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना उमेदवारी देण्यात आलेली होती प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासाठी
स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी नांदेडमध्ये सभा घेतली पण वसंतराव चव्हाण यांचा आत्मविश्वास
हा त्या काळात डगमगला नाही व 2024 ची लोकसभा निवडणूक वसंतराव चव्हाण(Vasantrao Chavan) हे पन्नास
हजार मताधिक्याने निवडून आले चार जून रोजी लोकसभेचे निकाल आले त्यानंतर वसंतराव यांनी नांदेड लोकसभा
मतदारसंघांमध्ये गाठीभेटी द्यायला चालू केले यादरम्यान एक अधिवेशन सुद्धा झाले पण बारा दिवसापूर्वी वसंतराव चव्हाण
यांना श्वसनाचा त्रास सुरू झाला त्यामुळे त्यांना नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले नांदेड
ते त्यांच्यावर उपचार सुरू झाले पण त्यांच्या यकृत मध्ये इन्फेक्शन झाल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने वसंतराव चव्हाण
(Vasantrao Chavan)यांना हैदराबाद येथे नेण्यात आले तेथे त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उच्चार चालू झाले त्यांना यकृताची
इन्फेक्शन व श्वास घेण्यासाठी त्रास होत होता तसेच रक्तदाबाचा ही त्यांना त्रास होता अशा परिस्थितीमध्ये बारा दिवस
त्यांच्यावर उपचार चालू होते पण त्यांची ही झुंज अपयशी ठरली व वयाच्या 64 व्या वर्षी वसंतराव चव्हाण यांनी शेवटचा
श्वास घेतला त्यांचे पार्थिव शरीर हे त्यांच्या मूळ गावी नायगाव येथे आणण्यात आले व त्यांच्यावर अंतिम संस्कार आज
करण्यात नांदेडचे खासदार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांच्यावर आज २७ ऑगस्टला जिल्ह्यातील नायगाव येथे शासकीय
इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्यांना
राज्य शासनामार्फत पुष्पचक्र अर्पण करीत श्रद्धांजली दिली. मंत्री महोदयांसोबत शासनामार्फत विशेष पोलीस
उपमहानिरीक्षक शाहाजी उमाप, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी
मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, नांदेड महानगरपालिकेतील आयुक्त डॉ. महेश डोईफोडे
यांनी पुष्पचक्र अर्पण केले.पोलीस दलातर्फे त्यांना हवेत तीन फैरी झाडून अंतिम सलामी देण्यात आली.
याप्रसंगी अशोकराव चव्हाणAshokrao Chavan) प्रताप पाटील चिखलीकर ,अमित देशमुख ,धीरज देशमुख
मोहन अण्णा हंबर्डे,कमल किशोर कदम,बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे, हेमंत पाटील,डॉक्टर अजित गोचडे,
अनिल मोरे,मनोहर धोंडे,राजेश पवार,डीपी सावंत,हनुमंत पाटील बेटमोगरेकर,सुधाकर पाटील पवार,चैतन्य बापू देशमुख
श्रवण पाटील बिलवंडे इत्यादी उपस्थित होते
वसंतराव चव्हाण यांच्या जाण्याने एक कर्तुत्वान व्यक्ती नांदेड जिल्ह्याने गमावला आहे त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून
सावरण्याची शक्ती ईश्वराने द्यावे
स्वर्गीय वसंतराव चव्हाण(Vasantrao Chavan)यांच्या कार्यास संकल्प पुढे चा मानाचा मुजरा
स्व.वसंतराव चव्हाण यांचा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
स्व.वसंतराव चव्हाण अनंतात विलीन
Add A Comment