मालवण मधील राजकोट किल्ल्या वरील नौदलाने उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज(Chhatrapati Shivaji Maharaj)यांचा पुतळा हा अचानक कोसळला
आणि यानंतर सत्ताधारी असलेल्या महायुतीमधील घटक पक्षांमध्ये याविषयी एक वाक्यता बघायला मिळाली नाही कारण सत्तेमध्ये असलेल्या तीन पक्षांनी वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य केली व पुतळा पडण्याच्या मागचे कारण सुद्धा वेगवेगळे सांगितले. यामुळे महाराष्ट्रातील शिवप्रेमींच्या मनामध्ये ही शंका उपस्थित होत आहे की हा पुतळा पडला की पाडला
महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज(Chhatrapati Shivaji Maharaj)यांचा पुतळा नौदलाच्या वतीने मालवण मधील राजकोट किल्ल्यावरती उभा केला गेला डिसेंबर 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका मोठ्या कार्यक्रमांमध्ये या पुतळ्याचे उद्घाटन केले गेले याप्रसंगी बोलताना नरेंद्र मोदी यांनी हा पुतळा संपूर्ण देशाला प्रेरणा देण्याचे काम करेल असे वक्तव्य त्यांनी आपल्या भाषणामध्ये केले पण यानंतर अवघ्या आठ महिन्यांमध्ये हा पुतळा कोसळला छत्रपती शिवरायांचा(Chhatrapati Shivaji Maharaj)पुतळा कोसळला ही बातमी प्रसार माध्यमांमध्ये आली आणि महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रेमी चांगलेच आक्रमक झाले आणि शासन स्तरावर मात्र या पुतळ्याविषयी हा छत्रपती शिवरायांचा(Chhatrapati Shivaji Maharaj)पुतळा का पडला याविषयी मात्र मंत्र्यांमध्ये एक वाक्यता दिसत नाही आपण आता पाहूया की कोणत्या मंत्राने पुतळा का पडला याविषयी काय वक्तव्य केले

मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे((Eaknath Shinde)
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे(Eaknath Shinde) यांना जेव्हा पत्रकारांनी छत्रपती शिवरायांचा(Chhatrapati Shivaji Maharaj)पुतळा कसा कोसळला असा प्रश्न विचारल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे(Eaknath Shinde) यांनी सांगितले की ताशी 48 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते आणि त्यामुळे हा पुतळा कोसळला
पण प्रत्यक्षात मात्र मालवण वासियांनी व तेथील मच्छीमारांनी इतक्या जोराचा वारा नव्हता असे सांगितले विरोधकांनी सुद्धा त्या दिवशी मालवण मध्ये एवढा वारा नव्हता असे वक्तव्य केले

खासदार नारायण राणे(Nrayan Rane)
मालवण कोकण म्हटल्यानंतर सगळ्यात आधी नाव येत ते नारायण राणे(Nrayan Rane)यांचे नारायण राणे(Nrayan Rane) यांनी छत्रपती शिवरायांचा(Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा कसा कोसळला याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की नैसर्गिक कारणांमुळे हा पुतळा उसळला
पीडब्ल्यूडी मंत्री
पीडब्ल्यूडी मंत्री यांनी छत्रपती शिवरायांचा पुतळा(Chhatrapati Shivaji Maharaj)कसा कोसळला याविषयी त्यांना प्रश्न केले असतात्यांनी समुद्रातून येणाऱ्या खाऱ्या वाऱ्यांमुळे गंज लागून हा पुतळा कोसळला आहे

दीपक केसरकर(Dipakl Kesarkar)हे शिक्षण मंत्री आहेत व त्यांच्या या अजब दाव्याने मात्र संपूर्ण महाराष्ट्रातील जनता संभ्रमात आहे की एवढा जबाबदार मंत्री अशा पद्धतीचे वक्तव्य कसे करू शकतात
आमदार नितेश राणे(Ntish rane)
आमदार नितेश राणे(Ntish rane)यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा(Chhatrapati Shivaji Maharaj)पुतळा कसा कोसळला याविषयी उत्तर देताना सांगितले की या पुतळ्याचा शिल्पकार आपटेला आम्ही आपटूत अशा पद्धतीचे उत्तर नितेश राणे यांनी दिले पिता-पुत्रांच्या दोघांच्याही वक्तव्यामध्ये खूप मोठी तफावत यामुळे पाहायला मिळाली
नारायण राणे म्हणतात की नैसर्गिक कारणांमुळे हा पुतळा कोसळला तर नितेश राणे(Ntish rane)म्हणतात की शिल्पकाराच्या चुकीने पुतळा पुसला एकाच घरामध्ये राहून दोघांनी वेगवेगळे कारणे दिली आहेत

निलेश राणे(Nilesh Rane)
खासदार नारायणराव राणे यांची चिरंजीव निलेश राणे(Nilesh Rane)यांनी तर थेट छत्रपती शिवरायांचा पुतळा(Chhatrapati Shivaji Maharaj)कोसळण्या मागे
कट असल्याचे सांगितले व आम्ही पुढील सहा दिवसांमध्ये याविषयीचे पुरावे देऊन असेही सांगितले राणे पिता-पुत्रांमध्ये एक वाक्यता का नाही नारायण आणि म्हणतात की नैसर्गिक कारणामुळे पुतळा कोसळला नितेश राणे(Ntish rane)
म्हणतात की शिल्पकाराच्या चुकीमुळे पुतळा कोसळला तर निलेश राणे(Nilesh Rane) म्हणतात की यामध्ये कुठेतरी कट आहे नेमकं या पुतळ्या बाबतीत काय घडलं असा प्रश्न सध्या महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadwanis)यांनी छत्रपती शिवरायांचा(Chhatrapati Shivaji Maharaj)पुतळा का कोसळला याचे उत्तर देताना त्यांनी या प्रकरणाचे सर्व खापर केंद्र सरकारवर फोडले त्यांनी सांगितले की या पुतळ्याचे काम हे राज्य सरकारने केलेले नाही हे नवदलाने केलेले आहे आणि नवदल हे केंद्र सरकारच्या येते या दुर्घटनेची चौकशी चालू आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadwanis)यांनी दिली
महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये मात्र आणखीन एक प्रश्न तयार होतो की केंद्रात जर सरकार हे भारतीय जनता पार्टीचे असेल महायुतीचे असेल तर मग ही जबाबदारी केंद्रावर टाकने कितपत योग्य आहे ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी व अजित दादा पवार यांनी मागितली माफी
मालवण मधील छत्रपती शिवरायांचा(Chhatrapati Shivaji Maharaj)पुतळा कोसळला या प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमात थेट शिवप्रेमींची माफी मागितली व छत्रपती शिवरायांचे सुद्धा माफी मागितली तसेच उपमुख्यमंत्री अजित दादा पवार(Ajit Dada Pawar) यांनी सुद्धा पुतळा कोसळल्या प्रकरणी जाहीर माफी मागितली व काळ्याफिती लावून निषेध देखील व्यक्त केला. महायुतीतील घटक पक्षातील नेत्यांमध्ये एक वाक्यता यावरून दिसत नाही
शिल्पकारावर गुन्हा दाखल
छत्रपती शिवरायांच्या(Chhatrapati Shivaji Maharaj)पुतळा कोसळल्या प्रकरणी शिल्पकार आपटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर आपटे हे फरार असल्याची चर्चा आहे
वरील सर्व वक्तव्य पाहता आपल्या असे लक्षात येईल की छत्रपती शिवरायांचा(Chhatrapati Shivaji Maharaj)पुतळा कोसळला याप्रकरणी सरकार फार गंभीर असल्याचे दिसत नाही कारण राज्यामध्ये महायुतीचे सरकार आहे यामधील तीन घटक पक्षांच्या प्रमुखांचे वक्तव्य हे पूर्णपणे वेगवेगळे आहेत त्यामुळे सुद्धा नेमकं हा पुतळा कसा कोसळला याविषयी जनतेच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत हा पुतळा कोसळला की पाडला याला कारण म्हणजे निलेश राणे(Nilesh Rane) यांचं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे(Eaknath Shinde) खासदार नारायण राणे यांनी नैसर्गिक कारणामुळे पुतळा कोसळला असे सांगितले तर अजित दादा पवार(Ajit Dada Pawar)यांनी थेट जनतेची माफी मागितली जर पुतळा नैसर्गिक कारणांमुळे पुसदला तर अजित दादा पवार(Ajit Dada Pawar)व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी का मागितली असाही प्रश्न आहे
निलेश राणे यांनी सांगितले छत्रपती शिवरायांचा पुतळा(Chhatrapati Shivaji Maharaj)कोसळण्याच्या मागे कट असल्याचे सांगितले व सहा दिवसात आम्ही पुरावे देऊन असे सांगितले पण अध्यापही निलेश राणे(Nilesh Rane)यांनी कुठलाही पुरावा हा प्रसारमाध्यमांच्या पुढे ठेवलेला नाही
शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या अजबदाऱ्याची सुद्धा चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात होत आहे
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात बोलताना समुद्राच्या जवळ असलेले कुठलेही बांधकाम करताना लोखंडा ऐवजी स्टेलनेस स्टीलचा वापर केला तरच ते बांधकाम अनेक वर्ष टिकू शकते असे सांगितले
महापुरुषांचे जे पुतळे असतात ते यासाठी उभारले जातात की त्या पुतळ्यांपासून आदर्श घेऊन आपण एखादे चांगले व मोठे काम करावे यासाठी मिळणारी प्रेरणा ही त्या पुतळ्याकडे पाहून आपल्याला मिळत असते हा विचार पुतळा उभारण्याच्या मागे असतो पण महाराष्ट्राचं अस्तित्व असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचाच पुतळा भ्रष्टाचारामुळे पडावा निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पडावा ही खरोखरच खेदाची गोष्ट आहे पण राजकारण्यांनी याच्यावर सुद्धा राजकारण करायला चालू केले आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागितलेली माफी पण केंद्र सरकार नौदलाने केलेल्या या कामाची योग्यरीता चौकशी करून यामध्ये दोषी असणाऱ्या अधिकारी कंत्राटदार शिल्पकार यांच्यावर कठोर कारवाई करेल काय ते आता पहावे लागेल
राज्यातील विरोधी पक्षनेत्यांनी मात्र या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहेत राज्यामध्ये ठीक ठिकाणी याविषयी आंदोलन होत आहेत
हा पुतळा पडला की पाडला यामागे कुठला कट तर नव्हता ना यामध्ये दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कंत्राटदानांवर कधी कारवाई होणार प्रत्येक जण आपली जबाबदारी दुसऱ्यावर टाकत आहेत त्यांच्यावर काही कारवाई होणार काय या प्रश्नांची उत्तरे यांना जनतेला द्यावीच लागतील