नवी दिल्ली – सध्या देशामध्ये सर्वत्र दहावी व बारावीच्या परीक्षेत चालू आहेत
व यामध्ये कॉपी सारखे प्रकार चालतात ही रोखण्यासाठी शासनाला अनेक
प्रकारे काम करावे लागते भरारी पथक हेड गार्ड असे नेमून कॉपी हा प्रकार
थांबवण्याचा प्रयत्न करतात पण आता केंद्रीय माध्यमिक बोर्ड अर्थात सीबीएससी
ओपन बुक टेस्ट घेण्याच्या विचाराधीन आहे
यामध्ये मुलांना सरळ पुस्तकांमध्ये
आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधून लिहावे लागतील परीक्षेच्या काळात अभ्यास करणे
ते कधी कधी लक्षात न राहणे यामुळे पालक तसेच विद्यार्थी दोघेही चिंतेत असतात
ही व्यवस्था आल्याने विद्यार्थ्यांचा ताण कमी होईल का की उलट त्यांच्या
बुद्धिमत्तेला चालना मिळणे बंद होईल असाही प्रश्न उपस्थित होतो
सीबीएससीच्या काही शाळांमध्ये हा प्रयोग तत्त्वावर करण्याचा सीबीएससी
बोर्ड विचार करत आहे पाहू पुढे काय होते ते