बिहारमध्ये परत एकदा राजकीय समीकरण बदलणार का ?याला कारण आहे मागील काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडी केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला नितीश कुमार (NITISH KUMAR)यांच्या पक्षाचा पाठिंबा आहे पण हा पाठिंबा भविष्यात राहील का नाही याविषयी सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे नेमकी या मागची काय कारणे आहेत ते आपण पाहूया

केंद्रातील एन डी ए चे सरकार आणि नितीश कुमार(The NDA government at the center and Nitish Kumar)
लोकसभा निवडणुकीला अवघी सहा महिने झाले आणि नितीश कुमार (NITISH KUMAR)हे नाराज असल्याच्या चर्चा सध्या प्रसार माध्यमांमध्ये येत आहेत यामध्ये सत्यता किती हा प्रश्न थोडा बाजूला ठेवूया पण नेमके या चर्चा का सुरू झाल्या खरंच नितेश कुमार हे एनडीए मधून बाहेर पडणार का ? केंद्रातील सरकार अस्थिर होणार का ?मागील काही महिन्यांमधील घडामोडी आपण पाहिल्या तर असेच काही संकेत मिळताना दिसत आहेत ? डिसेंबर महिन्याच्या शेवटी ला भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे दिल्लीमध्ये निधन झाले त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (NITISH KUMAR)हे दिल्लीला आले त्यांनी पार्थिव शरीराचे दर्शन देखील घेतले पण या दिल्ली वारीमध्ये नितीश कुमार (NITISH KUMAR)हे भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही बड्या नेत्याला भेटले नाही पूर्वी असे घडत नव्हते . भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी एनडीएच्या घटक पक्षांच्या बोलावलेल्या बैठकीमध्ये नितीश कुमार (NITISH KUMAR)आले नाही त्यामुळे या चर्चा सुरू झाल्या
हे हि वाचा-मंडल आयोगाच्या शिफारसी शरद पवार यांच्यामुळे लागू झाल्या ? -छगन भुजबळ
2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला 240 जागा मिळाल्या तर एनडीएला 293 एवढ्या जागा मिळाल्या यामध्ये महत्वाचे दोन नेते ठरले १)आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू २)व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (NITISH KUMAR)एनडीए मध्ये नितीश कुमार (NITISH KUMAR)यांच्या पक्षाला बारा जागा मिळाल्या तर चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाला 16 जागा मिळाल्या या दोघांच्या मदतीने भारतीय जनता पार्टी बहुमताचा आकडा गाठू शकली आणि भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी परत एकदा विराजमान झाले या दोन्ही पक्षाची गरज भारतीय जनता पार्टीला लागणारच आहे अगदी पहिल्या बजेटमध्ये सुद्धा ही गोष्ट जाणवली बिहार व आंध्र प्रदेश या दोन राज्यांना बजेटमध्ये झुकते माप मिळाले या दोन राज्यांच्या अनेक योजनांना मंजुरी मिळाली
मुख्यमंत्री पदा बाबतीत गृहमंत्री अमित शहा यांचे वक्तव्य (Home Minister Amit Shah’s statement regarding the post of Chief Minister)
नोव्हेंबर 2025 मध्ये बिहार राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत सध्या बिहारमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्याने नितीश कुमार (NITISH KUMAR)हे मुख्यमंत्री आहेत पण बिहारमध्ये मागील चार वर्षांमध्ये अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या सुरुवातीला भारतीय जनता पार्टीची साथ सोडत नितीश कुमार (NITISH KUMAR)यांनी राष्ट्रीय जनता दल सोबत तेजस्वी यादव यांच्या साथीने बिहारमध्ये सत्ता मिळवली पण अवघ्या काही महिन्यांमध्येच परत एकदा नितीश कुमार (NITISH KUMAR)यांनी भारतीय जनता पार्टी सोबतच राहणं पसंत केलं पाच वर्षाच्या कालावधीमध्ये नितीश कुमार (NITISH KUMAR)यांनी तीन वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आता होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी बिहारमध्ये एनडीए चा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असेल याविषयी गृहमंत्री अमित शहा यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता अमित शहा यांनी निवडणूक झाल्यानंतर आम्ही एकत्रित बसून याविषयी चर्चा करू असे उत्तर दिले आणि याच उत्तरामुळे भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमार (NITISH KUMAR)यांच्यामधील तणाव वाढला नितीश कुमार (NITISH KUMAR)यांना वाटत होते की आपणच मुख्यमंत्रीपदाची उमेदवार असून पण अमित शहा यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे नितेश कुमार नाराज असल्याच्या चर्चा आहेत

लालूप्रसाद यादव यांची नितीश कुमार (NITISH KUMAR)यांना दिली ऑफर (Lalu Prasad Yadav’s offer to Nitish Kumar?)
गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यानंतर लगेच लालूप्रसाद यादव यांनी नितीश कुमार (NITISH KUMAR)यांना आपल्या बाजूने यावे आम्ही त्यांना साथ देऊ प्रत्येक वेळी आम्ही बिहारच्या विकासाचा विचार करून एका जागी येतो पण नंतर नितीश कुमार (NITISH KUMAR)आमच्याशी मैत्री तोडतात आता जर ते येत असतील तर आमचे दरवाजे नितीश कुमार (NITISH KUMAR)यांच्यासाठी उघडे आहेत असे वक्तव्य त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाच्या वेळी दिले तसेच तेजस्वी यादव यांनी देखील मागील काही दिवसांमध्ये नितीश कुमार (NITISH KUMAR)यांची दोन-तीन वेळा भेट घेतली त्यामुळे बिहारमध्ये नेमकं काय चाललंय हे पहावे लागेल
बिहार मधील आपण सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करायला गेलो तर आपल्याला असे दिसेल की बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदार आहेत व भारतीय जनता पार्टीचा असलेला हिंदुत्ववादी चेहरा यामुळे मुस्लिम मतदार आपल्यापासून दुरावेल अशी भीती कुठून कुठ नितीश कुमार (NITISH KUMAR)यांना वाटण्याची शक्यता वर्तवली जात आहे हे कारण या दोन पक्षातील तणावासाठी कारणीभूत आहे ? ज्यावेळी केंद्र सरकारने वफ बोर्ड अॅक्ट मध्ये संशोधन करणारी विधेयक लोकसभेत आणले त्या वेळेला नीतीश कुमार यांचा विरोध असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित होत होत्या
हे हि वाचा-marathwada mukti sangram din काय आहे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच इतिहास?वाचा
शरद पवार(SHARD PAWAR)यांच्याशी भाजपा ची वाढती जवळीक ? (BJP’s growing closeness with Sharad Pawar?)
महाराष्ट्र विधानसभेमध्ये महायुतीला प्रचंड यश आले पण त्याआधी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात यश आले शरद पवार(SHARD PAWAR)यांच्या पक्षाचे तब्बळ आठ खासदार लोकसभेवर निवडून गेले विधानसभेच्या झालेल्या पराभवा नंतर शरद पवार(SHARD PAWAR)यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व गृहमंत्री अमित शहा या दोघांनीही दिल्ली येथील शरद पवार(SHARD PAWAR)यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या आणि शरद पवार(SHARD PAWAR)व भारतीय जनता पार्टी यांच्या जवळीक वाढली अशा चर्चा होऊ लागल्या दुसरे कारण म्हणजे की प्रसिद्ध उद्योजक गौतम आदानी व शरद पवार(SHARD PAWAR)यांचे असलेले जिव्हाळ्याचे संबंध हे महाविकास आघाडीला नेहमी खटकत राहिले आहेत पण भारतीय जनता पार्टी तील बडे नेते व गौतम अदानी यांची असलेली मैत्री यामुळे गरज पडल्यास गौतम आदाने हे मध्यस्थी करू शकतात शरद पवार(SHARD PAWAR)यांच्या पक्षाची आठ खासदार यामुळे नितीश कुमार (NITISH KUMAR)हे जरी नाराज झाले तरी केंद्रातील सरकारवर फार मोठा फरक पडणार नाही हेही कारण महत्त्वाचे आहे
हे हि वाचा-सावधान मोबाइलला मुळे होत आहेत मानसिक व आजार डोळयांचे आजार
बिहार मधील विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी नितीश कुमार (NITISH KUMAR)यांच्या पक्षाला सन्मान जनक जागा देईल याची शक्यता कमी दिसत आहे जर भारतीय जनता पार्टीने नितीश कुमार (NITISH KUMAR)यांच्या पेक्षा जास्त जागा लढविल्या तर भारतीय जनता पार्टीचे आमदार हे जास्त निवडून येतील मग मुख्यमंत्रीपद भाजपा नितेश कुमार यांच्या पक्षाला देईल तर कसे आत्ता सध्याच्या स्थितीला नितीश कुमार (NITISH KUMAR)यांचे फक्त 48 आमदार निवडून आलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे 70 आमदार बिहार विधानसभेत आहेत आमदार कमी असून देखील भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रा प्रमाणेच बिहारमध्ये देखील नितीश कुमार (NITISH KUMAR)यांना मुख्यमंत्री केलेले आहे पण जसे महाराष्ट्रामध्ये जास्त जागा आल्यानंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद द्यायला नकार दिला तशीच काही परिस्थिती बिहारमध्ये होईल अशी भीती कुठे ना कुठे नितीश कुमार (NITISH KUMAR)यांना असण्याची दाट शक्यता आहे जे ड यु चे अनेक नेते हे आम्ही विधानसभा निवडणूक ही स्वबळावर लढविणार असल्याच्या घोषणा देखील सध्या करताना दिसत आहेत
बिहारच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टी व जे ड यु यांना ही निवडणूक सोपी जाईल असे वाटत आहे पण प्रशांत किशोर यांच्या रूपाने एक नवीन आव्हान बिहार मधील सर्वच राजकीय पक्षांपुढे उभे झाले आहे मागील काही महिन्यापासून प्रशांत किशोर यांची वाढती लोकप्रियता बिहारच्या विधानसभेचे राजकारण फिरणार का ? भाजपा जे ड यु व राष्ट्रीय जनता दल यांना सोडून बिहारची जनता प्रशांत किशोर यांना संधी देणार काय हे निकाला नंतर स्पष्ट होईल पण
नितीश कुमार (NITISH KUMAR)हे नेमकं आता कोणता निर्णय घेतात हे पाहावे लागेल पण नितीश कुमार (NITISH KUMAR)यांनी जर एनडीएला सोडण्याचा निर्णय घेतला तर याचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा होणार आहे शरद पवार(SHARD PAWAR)व अजित दादा पवार या दोघांमधील तणाव कमी होईल का ?
गजानन चव्हाण