Author: Sankalp Today
संकल्प टुडे हे आपल्याला बातमी वेगळया अँगल दाखवेल पत्रकारितेचा अनुभव असलेली टीम हलक्या फुलक्या शब्दा मध्ये बातमी सांगेल संतोष पवार यांना १५ वर्ष पत्रकारितेचा अनुभव या वैचारिक लिखाणाने बातम्यानची व विचारांच्या भट्टीतून सोन तर चमकणारच
आज मी तुम्हाला शिक्षा देणार आहे नरेंद्र मोदी खासदारांना बोलले नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसदेमध्ये कामकाज संपल्यानंतर काही खासदारांना म्हणाले की मी तुम्हाला पनिशमेंट देणार आहे असं बोलून पंतप्रधान नरेंद्र मोदी काही खासदारांना घेऊन थेट संसदेच्या कॅन्टीनमध्ये पोहोचले व खासदारांसोबत जेवण केले वेळ दुपारचे दोन जागा संसद भवन दुपारच्या विश्रामामध्ये काही खासदार गप्पा मारत उभे होते व त्यामध्ये एक मंत्री सुद्धा होते ते बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तेथे आले व खासदारांना पाहून त्यांना म्हणाले की मै आपको पनिशमेंट देने वाला हू हे वाक्य ऐकताच खासदारांच्या मात्र कपाळाला अटी आल्या आता मोदी आपल्याला कुठली पनिशमेंट देणार या…
डॉ .दिनेश राठोड लोहा मूत्रकृत्छ म्हणजेच मुतखडा मुत्राची कष्टाने प्रवृत्ती होणे त्यावेळी वेदना सहन न होणे यालाच मुत्रकृछ असे म्हटले जाते. या व्याधिमध्ये थांबून वारंवार अगदी अल्प प्रमाणात मूत्रप्रवृत्ती होते, हा एक गंभीर असा मध्यम मार्गातील व्याधी आहे.मुत्रप्कृछ आणि मूत्राघात एक नसून वेगवेगळ् व्याधी आहेत मूत्रकृत्छ मध्ये लघवी अडकत अडकत होते आणि मुत्रघात त्यामध्ये लघवी लगेच थांबून जाते त्याला आपण रिटेन्शन म्हणतो. सात प्रकार आहे वातच,पित्तच,कफच,सनीपातीक, पुरिषिज, अशिमरिज अभिघातज, शुक्रजां असे चरक सहिंतेमध्ये आठ प्रकार सांगितले आहेत. हेतु.. म्हणजेच कारण अति व्यायाम, तिक्षण औषधांची सेवन, रुक्ष पदार्थाची सेवन, घोड्यासारख्या अती वेगवान वाहनावर बसून प्रवास करणे, अनुप मांस व मासे अधिक…
राज्यसभेच्या खासदारांचा कार्यकाळ संपला व देशभरात राजकीय हालचालींना वेग आला यामध्ये महाराष्ट्रातील सहा खासदार चा कार्यकाळ संपला आज राजकीय बलाबल पाहता भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांना पाच जागा मिळतील तर एक जागा काँग्रेसला जाईल जर काँग्रेसने दुसरा उमेदवार दिला नाही तर ही निवडणूक बिनविरोध होईल जर काँग्रेसने उमेदवार दिला तर निवडणूक होऊ शकते पण सध्या परिस्थिती पाहता काँग्रेस दुसरा उमेदवार देणार नाही असेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे भारतीय जनता पार्टी यांच्याकडे अनेक इच्छुक उमेदवार आहेत पण अंतिम निर्णय हा पक्षश्रेष्ठी घेईल असं बोललं जात आहे पण भारतीय जनता पार्टीने काही नाव ही पक्षश्रेष्ठीला कळवली आहेत ज्या नावांची चर्चा आहे…
सोनखेड – कलयुगामध्ये चमत्कार होतात का असा प्रश्न प्रत्येकाला पडतो पण एखाद्या देवावर जर आपली अमाप श्रद्धा असेल तर निश्चित चमत्कार हे घडतातच असाच काही अनुभव प्रत्येक श्रद्धावान व्यक्तीला हा येतच असतो देव वेगळे असतील श्रद्धा करण्याचे स्थान वेगळे असतील पण याचा रिझल्ट हा नेहमी सकारात्मकच येतो दत्तगुरूंचे अवतार साईबाबा’गजानन महाराज’श्री स्वामी समर्थ आणि इतर या सर्वांची उपासना करणारा खूप मोठा वर्ग हा महाराष्ट्र मध्ये तसेच भारतात आहे यामध्ये या श्रद्धावान लोकांना मोठ्या प्रमाणात अनुभव येतोच असेच काही अनुभव आपण पाहूया लोहा नांदेड रोडवर वसलेले सोनखेडे गाव शेती हा इथला मुख्य व्यवसाय तसेच या गावांमध्ये तुकाराम महाराजांना मानणारा खूप मोठा…
रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास हे आज पतधोरण जाहीर करणार आहेत आपल्याला वाटते या पतधोरणाचा सामान्य माणसाच्या आयुष्यावर काय परिणाम होतो आपण सोप्या भाषेत समजून घेऊया की पतधोरण म्हणजे काय सगळ्या बँका या रिझर्व बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वाखाली काम करतात रिझर्व बँकेने ठरवून दिलेल्या पद्धतीमध्येच बँकांना काम करावे लागते तसेच व्याजदर कार्यप्रणाली याविषयी सुद्धा रिझर्व बँक बँकांना सूचना करते बँका या रिझर्व बँकेकडून कर्ज घेऊन आपल्या ग्राहकांना देते ते कसे एका उदाहरणावरून समजून घेऊ समजा रिझर्व बँकेने बँकांना चार टक्क्याने कर्ज दिले तर बँका आपला मुनाफा जोडून आठ टक्क्याने ग्राहकांना कर्ज देते या घेतलेल्या कर्जाला रिझर्व बँकेच्या भाषेमध्ये रेपो असे म्हणतात…
नवी दिल्ली -संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद मोदी यांनी यावेळी पंतप्रधान मोदींनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. तसेच, आपल्या भाषणादरम्यान विकसित भारताचा पाया मजबूत करण्यासाठी मोदी 3.0 ची घोषणा करत आगामी पाच वर्षाचा रोडमॅप सांगितला. आमच्या सरकारची तिसरी टर्म आता दूर नाहीये आम्ही सत्तेत म्हणजेच ३.० आल्यावर विकासाचा वेग हा आतापेक्षा निश्चित जास्त असेल तिसऱ्या टर्म मध्ये मेडिकल कॉलेज आय आय टी ची संख्या वाढेल व ए आय टेक्नॉलॉजी वापरण्यावर आमच्या सरकारचा भर असेल येत्या पाच वर्षांमध्ये बुलेट ट्रेन भारतातील लोकांना मिळेल व पाच वर्षा सर्व घरांमध्ये पाईप द्वारे गॅसचा पुरवठा करण्यात…
मुदखेड तालुक्यातील छोटेसे गाव ईजळी मुदखेड शहरापासून जवळच असलेलं या गावांमधील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती परंपरागत शेतीमध्ये येणाऱ्या अडचणी मुळे शेतकरी चांगलाच परेशान होता पर्यायी शेतीला जोडधंदा असावा ही संकल्पना शेतकऱ्यांच्या मनात आली व शेतकरी हळूहळू शेतीपूरक व्यवसाय (AGRI bSUINESS) कडे वळू लागले याच गावामध्ये रुस्तुम मुंगल पाटील हे आपल्या तीन मुलासहित राहतात मुलांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रुस्तुम भाऊंनी शेतामध्ये घर बांधण्याचा निर्णय घेतला व आपले वडिलोपार्जित घर सोडून त्यांनी शेतामध्ये घर बांधलं व आता मुलांना पुढे काय करा लावायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला फक्त पाच एकर जमीन असल्यामुळे एवढं मोठं कुटुंब चालवायचं कसं असाही प्रश्न रुस्तुमरांवांपुढे आला पण…
संपूर्ण जगभरामध्ये करोणाचे संकट आले संपूर्ण जग बंद पडले होते पण या दोन वर्षाच्या दरम्यान लोकांमध्ये आरोग्य विषयक मोठी जागृती आली विशेष म्हणजे ऍलोपॅथीच्या नादाला न लागता लोक आयुर्वेद व व्यायाम योगासने वेगळ्या प्रकारचे काढे पीत होते याच दरम्यान व्यायामा बाबतीत लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात जागरूकता आली योगासने करू लागली अशातच एका व्यवसायाकडे दुर्लक्ष झालेपण खऱ्या अर्थाने या व्यवसायाने टॉप गेएर गाठला मुळात आपण जर जपानचा विचार केला तर आपल्याला असे लक्षात येईल कि तेथे व पश्चिमयात देशां मध्ये सायकल वापरणायचे प्रमाण जास्त आहे तया मानाने आपण भारतीय सायकल वापरणे हे गरिबीचे लक्षण मानतो पण जपान व बाकी देश हे आपल्या…
भारताचे माजी गृहमंत्री व उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न हा देशातील सर्वोच्च बहुमान देण्याचा निर्णय झाला आहे स्वतः नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर माहिती दिली व लालकृष्ण अडवाणी यांचे घरी जाऊन अभिनंदन केले व ते फोटो मीडियामध्ये शेअर केले लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1927 रोजी कराची मध्ये झाला त्यांच्या आईचे नाव ज्ञानी अडवाणी तसेच वडिलांचे नाव के डी आडवाणी असे होते नंतर ते भारतात आले व पुढील शिक्षण त्यांनी भारतात केले आडवाणी हे लॉ ग्रॅज्युएट आहेत त्यांच्या पत्नीचे नाव कमला अडवाणी शिक्षणानंतर त्यांनी सक्रिय राजकारणात सहभाग घेतला व ते 1986 मध्ये ते बीजेपीचे अध्यक्ष झाले बीजेपी चे…
मराठा आरक्षण प्रश्न वर बोलताना राज ठाकरे यांनी मनोज जरांगे यांना गुलाल उधळला मग उपोषण कशाला अशी प्रतिक्रिया दिली एका पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर शासनाने सर्व मागण्या मान्य केल्यात असे सांगितले याचा गुलाल देखील उधळला मग दहा फेब्रुवारीपासून उपोषण कशासाठी असाच सवाल ठाकरे यांनी केला मी जेव्हा जरांगे पाटील यांना भेटायला गेलो तेव्हा मी त्यांना सर्वांसमोर सांगितले होते की हा तांत्रिक विषय आहे कायद्याच्या दृष्टिकोनाचा विषय आहे अशा प्रकारचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकणार नाही त्यासाठी सर्वोच्च उच्च न्यायालयत जावे लागेल साठी विशेष अधिवेशन बोलावे लागेल ही प्रक्रिया म्हणावी तेवढी सोपी नाही असे मी सर्वांसमोर जरंगे पाटील…