Author: Sankalp Today
संकल्प टुडे हे आपल्याला बातमी वेगळया अँगल दाखवेल पत्रकारितेचा अनुभव असलेली टीम हलक्या फुलक्या शब्दा मध्ये बातमी सांगेल संतोष पवार यांना १५ वर्ष पत्रकारितेचा अनुभव या वैचारिक लिखाणाने बातम्यानची व विचारांच्या भट्टीतून सोन तर चमकणारच
आमिर खानच्या दंगल चित्रपटातील छोट्या बबीता ची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुहानी भटनागर च दिल्ली येथे निधन झाले ती फक्त 19 वर्षाची होती दंगल या चित्रपटामुळे सुहानी अचानक प्रसिद्ध झोतात आली दंगल चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी झाला आमिर खान सोबतच चिमुकली बबीता उर्फ सुहानी भटनाकर हिचाही अभिनयाची प्रचंड तारीफ त्यावेळी झाली पण नियतीला काही वेगळेच मान्य होते अवघ्या 19 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला काही काळापूर्वी तिचा अपघात झाला व तिच्या पायाला फ्रॅक्चर झाले होते उपचारादरम्यान घेण्यात आलेल्या औषधांमुळे तिच्या शरीरामध्ये पाणी साचायला लागले नंतर तिला उपचारासाठी दिल्ली एम्स मध्ये नेण्यात आले तेथे उपचार चालू असताना तिची मृत्यूची झुंज अपयशी…
अंतरवाली सराटी -मनोज जरांगे पाटील यांना काल हायकोर्टाने विचारले होते की तुम्ही औषधोपचार घेणार की नाही हे स्पष्ट सांगा असे निर्देश हायकोर्टाने जरांगे पाटील यांना दिले होते 10 फेब्रुवारीपासून मनोज जारांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे अमरण उपोषणाला बसले आहेत त्यांच्या प्रमुख मागणी सगळे सोयरे या अध्यादेशाचे रूपांतर कायद्यात करणे विशेष अधिवेशन बोलवणे हे आहेत तर काल हायकोर्टाने या आदेशा प्रमाणे मनोज जरांगे पाटील यांनी काल सलाईन घेतले पण त्यांची प्रकृती मात्र खालावली आहे काल काही वेळा पर्यंत त्यांना शुद्ध पण नव्हती हे आपण वेगवेगळ्या चॅनेल पाहिले आहे दरम्यान शासन स्तरावर राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल हा मराठ्यांच्या बाजूने आहे असे…
तिरुपती – तिरुपती मधील वेंकटेश्वरा प्राणी संग्रहालयामध्ये मध्य धुंद एका व्यक्तीने सिंहाच्या पिंजऱ्यात उडी घेतली व सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला पण हा प्रयत्न त्याच्या जीवावर बेतला राजस्थान मधून आलेल्या एका युवकाने नशेमध्ये धुंद होऊन सेल्फी काढण्यासाठी चक्क सिंहाच्या पिंजऱ्यात उडी घेतली व सेल्फी देखील काढली पण याचवेळी सिंहाने त्याच्यावर हल्ला केला कसाबसा सुटून तो झाडावर चढला पण सिंहगर्जना ऐकून तो घाबरला व झाडावरून खाली पडला त्यानंतर सिंहाने त्याच्यावर हल्ला केला व त्याला जागीच ठार केले यामुळे व्यंकटेश्वरा प्राणीसंग्रहालयात एकच गोंधळ उडाला प्राणीसंग्रहातील कर्मचाऱ्यांनी आवाज करून सिंहाला बाजूला पळवले व मयत व्यक्तीला बाहेर काढले पण खूप उशीर झाला होता सिंहाने तेव्हाच…
नांदेड ला मिळणार तीन खासदार मागील काही दिवसापासून नांदेड जिल्हा चर्चेत आहे कारण माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीत केलेला प्रवेश व राज्यसभेची निवडणूक हा योग जुळून आला अशोकराव चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश घेतल्यापासून त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित होते पण आज भाजपा पक्षाचे जाहीर केलेल्या यादीमध्ये नांदेडचे डॉक्टर अजित गोपछडे यांना उमेदवारी जाहीर केली यामुळे नांदेड वासीय मात्र आनंदात आहेत डॉक्टर अजित गोपछडे हे मागील अनेक वर्षापासून पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रतिष्ठान च्या वतीने गरीब रुग्णांना गावोगावीत जाऊन आरोग्य शिबिर आयोजित करणे व त्यांना मोफत उपचार देणे अशा प्रकारचे काम डॉक्टर गुपछडे करत होते तसेच ते…
भारतीय जनता पार्टीने आज आपली राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली यामध्ये चर्चेत असलेले माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे तसेच या यादीमध्ये चर्चेत नसलेले नाव डॉक्टर अजित गोपछडे जे नांदेडमध्ये डॉक्टर आहेत त्यांचंही नाव या यादीत आहे तसेच श्रीमती मेधा कुलकर्णी यांचे नाव या यादीत आहे अजित गोपछडे व अशोकराव चव्हाण हे दोघेही नांदेड शहरातील आहेत भारतीय जनता पार्टीने तीनच नाव घोषित केलेले आहेत त्यामुळे चौथा उमेदवार भारतीय जनता पार्टी देते की नाही ते पाहावं लागेल जर भाजपाने चौथा उमेदवार नाही दिला तर ही निवडणूक बिनविरोध होईल तसेच भाजपाने नारायण राणे व पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली…
लोहा -मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील 10 फेब्रुवारी पासून अमरण उपोषणाला बसले आहेत आज पाच दिवस झाले व मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत आहे यामुळे सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे त्याला लोहा शहरातील व्यापाऱ्यांनी पाठिंबा देत आपली दुकाने हॉटेल्स शंभर टक्के बंद ठेवली लोहा शहरांमध्ये हा बंद 100% आहे सगे सोयरे या अध्यादेशाची रूपांतर जीआर मध्ये करा या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत मागील पाच दिवसापासून त्यांनी वैद्यकीय तपासणी करून घेतलि नाही असाही निर्णय घेतला त्यांची प्रकृती खालावत आहे यामुळेच मराठा समाजाने बंदची हाक दिली नांदेड जिल्ह्यातील लोहा…
सकल मराठा समाजाच्या वतीने आज महाराष्ट्र बंदची हाक पोनि चिंचोलकरांना दिले निवेदन लोहा,आंबादास पवार सकल मराठा समाजाच्या वतीने आज दि.(१४) फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असल्याचे व सदरील बंद उग्र आंदोलन न करता , संविधानीक मार्गाने शांततेत करत असल्याचे निवेदन सकल मराठा समाज लोहाच्या वतीने लोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांना देण्यात आले. सदरील निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, मराठा आरक्षणा संदर्भात सगे सोयरे या शब्दाची व्याख्या करून अधिसूचनेचे रूपांतर कायद्यात करण्यात यावे. एक दिवशीय विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणाचा कायदा करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील दि.(१०) फेब्रुवारी पासून…
अशोकराव चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रात होणाऱ्या राज्यसभेचे निवडणुकीचे गणित मात्र बिघडण्याची शक्यता आहे राज्यसभेच्या सहा जागांसाठी सध्या निवडणुका चालू आहेत यामध्ये पक्षीय बलाबल पाहता महायुतीला पाच तर काँग्रेसला एक जागा मिळणार होती पण अशोकराव चव्हाण यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे राज्यसभेचे काँग्रेसचे गणित बिघडण्याची शक्यता आहे कारण अशोकराव चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे जवळपास 15 आमदार हे भाजपाच्या वाटेवर आहेत अशी चर्चा आहे महाराष्ट्र विधानसभेमध्ये 288 आमदार आहेत व राज्यसभेच्या सहा जागा आहेत म्हणजे एका खासदाराला निवडून येण्यासाठी 42 मतांचा कोटा आहे महा युतीचे पक्षीय बराबल पाहता भाजपा तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेस एक जागा व शिवसेना एक जागा अशा पद्धतीने पाच जागांची वाटप होऊ…
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे नेते अशोकराव चव्हाण यांनी आपल्या पक्ष सदस्याचा राजीनामा दिला आहे मागील काही दिवसापासून अशोकराव चव्हाण हे काँग्रेस नेतृत्वावर नाराज आहेत अशा प्रकारच्या चर्चा होत्या त्यामुळे अशोकराव चव्हाण राजीनामा देणार हे राजकीय वर्तुळात निश्चित मानला जात होतं आज त्यांनी आपल्या पक्ष सदस्याचा राजीनामा नाना पटोले यांच्याकडे दिला आहे अशी माहिती मिळत आहे मागील काही वर्षांपासून पहिले शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस मधून अजित पवार यांचा गट बाहेर पडला पण काँग्रेसची मात्र पडझड झाली नव्हती पण आता मात्र महाराष्ट्रातील काँग्रेसचे मोठे नेते अशोकराव चव्हाण यांनीच आपल्या पक्ष सदस्यता चा व आमदारकीचा दोन्ही राजीनामा दिला आहे त्यामुळे…
लोहा – दोन वर्षापूर्वी संपूर्ण जग करोणाच्या विळख्यात अडकले होते या प्रसंगी माणसाला सर्वात जास्त गरज पडली ती डॉक्टरांची पहिल्यांदा पी पी ई कीट मध्ये डॉक्टरांच्या रूपात साक्षात देवच इलाज करत आहेत असे सर्वांना वाटू लागले मुळात दवाखाना म्हटले व्याधीने ग्रस्त असलेल्या लोकांना मंदिरा सारखा वाटतो डॉक्टर जर गेल्यानंतर हसून व आपुलकीने बोलत असेल तर निम्मा रोग तसाच बरा होतो धीर देणारा डॉक्टर प्रत्येकाला हवा आसतो नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरांमध्ये डॉक्टर दीपक मोटे हे साक्षात देवदुतच म्हणावे लागतील करोना काळामध्ये प्रचंड घाबरलेल्या लोकांना धीर देण्याची काम व स्वतःच्या जीवाची काळजी न करता डॉक्टर मोटेनी ही जबाबदारी यशस्वी पार पडली नोकरी…