मिरची चे भाव एका दिवसामध्ये वीस हजार रुपयावरून
थेट आठ हजार रुपये प्रति क्विंटल आल्यामुळे
संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी जाळपोळ करण्यास
सुरुवात केली
घटना आहे कर्नाटक मधील हावेरी येथील हावेरी
हे कर्नाटक मधील मिरचीसाठी प्रसिद्ध आहे येथे
लांबून व्यापारी मिरची घेण्यासाठी येतात येथे मोठ्या
प्रमाणात मिरचीची उलाढाल होते पण एकाच
दिवसांमध्ये वीस हजार रुपये प्रतिक्विंटल असणारी
मिरची थेट आठ हजार रुपये आली त्यामुळे संतप्त
शेतकरी रस्त्यावर उतरून जाळपोळ करायला लागले
तेथील मार्केट कमिटीचे पण मोठ्या प्रमाणात नुकसान
केले
व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे सगळे शेतकरी हे
अडचणीत आलेले आहेत जीवापाड महिनत करून तयार करण्यात आलेल्या पिकाला जेव्हा कवडीमोल भाव
मिळतो तेव्हा शेतकऱ्यांच्या मनाला किती वेदना होतात हे कोणत्याही सरकारच्या लक्षात येत नाही आता एका
दिवसात जर बारा हजार रुपयांनी भाव पडत असतील तर शेतकऱ्यांना शेती कशी .
परवडेल एवढेच म्हणावं लागेल कर्नाटक मधील शेतकऱ्यांना मिरचीने मात्र रडवले