Close Menu
Sankalp Today
    Recent News

    1st June New Rule-1 जून पासून होणार मोठे बदल

    June 1, 2025

    Vitamin B12 deficiency-व्हिटॅमिन B12 चा अभाव? होतील गंभीर आजार?

    May 28, 2025

    Vaccination in animals- पावसाळ्या आधी करा जनावरांचे लसीकरण

    May 27, 2025

    Corona update : करोनाने पुन्हा वर डोकं काढलं

    May 26, 2025

    Indian economy-भारताची अर्थव्यवस्था झाली जगातील चार नंबरची अर्थव्यवस्था

    May 26, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, June 20
    • Home
    • About Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Contact Us
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Sankalp TodaySankalp Today
    • होम
    • देश
    • ट्रेंडिंग न्यूज़
    • महाराष्ट्र
      • खानदेश
      • मराठवाडा
    • राजकीय
    • व्यवसाय
    • खेळ
    • मनोरंजन
    • लाइफ स्टाइल
    Sankalp Today
    Home » अजित दादा पवार नाराज महायुतीची साथ सोडणार?
    No Comments

    अजित दादा पवार नाराज महायुतीची साथ सोडणार?

    जागावाटप,तानाजी सावंत,या मुळे दादा नाराज?
    Sankalp TodayBy Sankalp TodaySeptember 1, 2024

    मागील विधानसभा निवडणुकीच्या नंतर ते 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये
    या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक राजकीय घडामोडी पाहिल्या या पाच वर्षांमध्ये दोन
    मुख्यमंत्री सुद्धा महाराष्ट्राला मिळाले या पाच वर्षात महाराष्ट्रामध्ये राजकीय अस्थिरता मोठ्या
    प्रमाणात होती 2019 चे विधानसभा निवडणुकीचे निकाल आले व कुठल्याही राजकीय पक्षाला
    स्पष्ट बहुमत मिळाले नाही पण युतीला मात्र स्पष्ट बहुमत मिळाले भारतीय जनता पार्टी व शिवसेना
    या दोघांची युती होती आणि या दोघांच्या संख्याबळामुळे युतीला महाराष्ट्रात स्पष्ट बहुमत मिळाले
    पण अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री असं आधी ठरलं होतं असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी
    भारतीय जनता पार्टी(BJP) सोबत जाण्यास नकार दिला आणि हे महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात
    मोठे वळण होते आणि यानंतर उद्धव ठाकरे यांनी थेट शरद पवार व काँग्रेस सोबत मिळून महाविकास
    आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन केली व स्पष्ट बहुमत देखील त्यांना मिळाले या
    झालेल्या प्रकारामुळे भारतीय जनता पार्टीच्या(BJP) गटांमध्ये कमालीची अस्वस्थता होती हातात तोंडाशी
    आलेला घास गेला म्हणून भारतीय जनता पार्टीचे नेते कमालीचे रागात होते आणि त्यानंतर विधान परिषदेच्या
    निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे(Eakntha Shide) यांनी बंड करत युतीमध्ये भारतीय जनता पार्टी सोबत
    सामील व्हायचा निर्णय घेतला व एकनाथराव शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले यात झालेल्या राजकीय
    उलथा पालथीमुळे राजकीय पक्ष हे कमालीचे चिंताग्रस्त होते भारतीय जनता पार्टी व शिवसेना शिंदे गट
    या दोघांचे मिळून संख्याबळ हे बहुमता पेक्षा जास्त झाले आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले स्पष्ट
    बहुमत असताना देखील देवेंद्र फडणवीस(Devendra Fadvanis)यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधून
    अजित दादा पवार(Ajit Dada Pawar) यांना आपल्याकडे घेतले व त्यांनाही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री केले.
    आता प्रमुख दोन राजकीय पक्षांचे दोन गट पडले होते
    राष्ट्रवादी काँग्रेसला व अजितदादा पवार यांना बरोबर घेतल्यामुळे नाराजी
    (Displeasure because NCP and Ajitdada Pawar were taken together)
    अजितदादा पवार यांनी केलेला बंड आणि ते थेट महायुतीमध्ये सत्तेत देखील आले यामुळे स्पष्ट बहुमत असून
    देखील अजित दादा पवार(Ajit Dada Pawar) यांना बरोबर घ्यायची गरज काय असा प्रश्न त्याकाळी शिवसेना
    शिंदे गटाचे नेते हे देवेंद्र फडणवीस(Devendra Fadvanis) यांना विचारत होते पण शरद पवार यांना शह
    देता येईल व याचा फायदा लोकसभेला होईल असा अंदाजा देवेंद्र फडणवीस यांचा होता पण लोकसभेच्या
    निकालानंतर मात्र भारतीय जनता पार्टी(BJP) व महायुती शरद पवार यांना शह देण्यामध्ये यशस्वी ठरली नाही
    असे दिसले राष्ट्रीय स्वयंसेवी संघाचे मुखपत्र ऑर्गनायझर मधून सुद्धा अजितदादा पवार(Ajit Dada Pawar)व
    राष्ट्रवादी काँग्रेसला(Nationalist Congress Party)बरोबर घेतल्यामुळेच लोकसभेला महाराष्ट्रामध्ये
    भारतीय जनता पार्टीचे(BJP) मोठे नुकसान झाल्याचा आरोप देखील करण्यात आला व संघाच्या नेत्यांनी
    याबद्दल उघड नाराजी देखील व्यक्त केली याला कारण होते राष्ट्रवादी काँग्रेस(Nationalist Congress Party)
    मधील अजितदादा पवार(Ajit Dada Pawar) व छगन भुजबळ यांच्यावर भारतीय जनता पार्टीच्या(BJP)
    नेत्यांनी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप अजित दादा पवार(Ajit Dada Pawar) यांनी बंड करण्याच्या अवघ्या एक
    महिना आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमात बोलताना 70000 कोटीचा घोटाळा हा अजितदादा पवार
    यांच्या काळात झाले असल्याचा आरोप केला व त्यांच्यावर केला त्यांच्यासोबतच सत्ता स्थापन करण्याबाबत
    भारतीय जनता पार्टीचे(BJP) कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती
    नवाब मलिक यांच्यामुळे भाजपा नाराज
    (BJP is upset because of Nawab Malik)
    राष्ट्रवादी काँग्रेसचे(Nationalist Congress Party)ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्यावर नऊ नोव्हेंबर 2021 रोजी
    देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची नवाब मलिक(Navab Malik) यांचे संबंध हे अंडरवर्डशी असल्याचा आरोप केला
    त्यावेळी महाराष्ट्र मध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते हा आरोप झाल्यानंतर 9 मार्च 2022 रोजी भारतीय जनता
    पार्टीने एक मोठा मोर्चा देखील मुंबईमध्ये काढला व नवाब मालिक हटाव महाराष्ट्र बचाव अशा घोषणा देखील
    दिल्या त्यानंतर नवाब मलिक यांच्यावर गुन्हा दाखल झाला व ते तुरुंगात गेले याच दरम्यान महाराष्ट्रात झालेल्या
    सत्ता पालट नंतर नवाब मलिक(Navab Malik) यांना वैद्यकीय जामीन न्यायालयाकडून मिळाला व विधानसभेच्या
    अधिवेशनामध्ये नवाब मलिक(Navab Malik) नेमके शरद पवार यांच्या बाजूने जातात की अजित पवार
    (Ajit Dada Pawar) यांच्या बाजूने येतात याविषयी आणखीन स्पष्टता नव्हती पण नवा मलिक विधानभवनात आले
    व थेट सत्ताधारी बाकावर जाऊन बसले यानंतर नाराज झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी याची
    तक्रार देवेंद्र फडणीस(Devendra Fadvanis)यांच्याकडे केली देवेंद्र फडणवीस यांनी 07 डिसेंबर रोजी
    अजितदादा पवार(Ajit Dada Pawar) यांना पत्र लिहून याबाबतीत नाराजी व्यक्त केली पण याचा कुठलाही
    परिणाम अजितदादा पवार(Ajit Dada Pawar) यांच्यावर झाला नाही त्यांनी त्या पत्राला केराची टोपली दाखवली
    व नवाब मलिक(Navab Malik) यांच्या कन्या सना मलिक शेख यांना राष्ट्रवादी काँग्रेस
    (Nationalist Congress Party)पक्षाचे प्रवक्ते पदी नियुक्ती केली
    तानाजी सावंत यांचे वक्तव्य मुळे अजितदादा नाराज
    (Ajit Dada is upset because of Tanaji Sawant’s statement)
    आरोग्य मंत्री तानाजी सावंत(Tanaji Sawant)यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे सुद्धा महायुतीमध्ये
    मोठा तणाव निर्माण झाला आहे तानाजी सावंत(Tanaji Sawant)यांनी एका कार्यक्रमात बोलताना जो सच्चा
    शिवसैनिक आहे तो काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सोबत काम करू शकत नाही आज मंत्रिमंडळात जरी
    आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या(Nationalist Congress Party)नेत्यांसोबत मांडीला मांडी लावून बसलेले असलो
    तरी बाहेर आल्यानंतर मला उलट्या होतात असं व्यक्त करून तानाजी सावंत(Tanaji Sawant)यांनी स्वतःची
    नाराजी स्पष्ट केली यामुळे महायुतीमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी यासंदर्भामध्ये
    अजितदादा पवार सुनील तटकरे यांना थेट सत्तेतून बाहेर पडण्याचा ही मागणी केली यानंतर अजितदादा पवार
    (Ajit Dada Pawar) व सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे(Eakntha Shide) यांच्याकडे नाराजी
    सुद्धा व्यक्त केली यामुळे सुद्धा महायुतीमध्ये मोठा तणाव निर्माण झाला सध्या अजितदादा पवार(Ajit Dada Pawar)
    यांची जनसम्मान रॅली ही महाराष्ट्र मध्ये चालू आहे महत्त्वाचे म्हणजे या रॅलीच्या बॅनर मधून मुख्यमंत्री माझी
    लाडकी बहीण योजना याचा उल्लेख काढून टाकला आहे
    तसेच 9000 कोटी रुपयाच्या ॲम्बुलन्स कंत्राटामुळे सुद्धा अजित दादा(Ajit Dada Pawar) पवार व एकनाथराव
    शिंदे यांच्यामध्ये नाव असल्याचे बोलले जात आहे बदलापूर मध्ये घडलेल्या घटनेचा विरोध करण्यासाठी जमलेला
    जनसमुदाय यात विरोधी पक्षाचा हात आहे असा आरोप एकनाथराव शिंदे(Eakntha Shide) यांनी केला तर
    अजितदादा पवार यांनी बदलापूर घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करण्याचे मागणी केली
    राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला याला कोणत्या गोष्टी कारणीभूत आहे
    यावरून सुद्धा महायुतीमध्ये एक वाक्यता नसल्याचे दिसून येते
    मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी 45किलोमीटर प्रति वेगाने वारे वाहत असल्यामुळे पुतळा कोसळल्याचे
    सांगितले तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadvanis)यांनी हे काम आम्ही नाही तर नौदलाने
    केले असल्याचे सांगितले
    आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मात्र मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
    (Devendra Fadvanis)यांच्या पेक्षा काही वेगळे वक्तव्य केले त्यांनी थेट जनतेची माफी मागितली तसेच देशाचे
    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या प्रकरणावर माफी मागितली
    लोकसभेला महायुतीमध्ये अजित दादा पवार(Ajit Dada Pawar) यांना कमी जागा मिळाल्या अशीच अवस्था
    ही विधानसभेला आपल्या पक्षाची तशीच अवस्था होऊ नये यामुळे सुद्धा अजितदादा पवार आतापासून सतर्क असल्याचे बोलले
    जात आहेत काल नागपूर मध्ये एका कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते या
    कार्यक्रमाच्या नंतर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे(Eakntha Shide) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
    (Devendra Fadvanis)यांनी राष्ट्रीय स्वयंसेवी संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार व गोळवळकर गुरुजी यांच्या
    स्मृती स्थळाचे दर्शन घेतले तर एका कार्यक्रमात बरोबर राहून देखील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
    (Ajit Dada Pawar) यांनी हेडगेवार व गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतिस्थळावर जाणे टाळले यामुळे सुद्धा
    महायुतीमध्ये तणाव असल्याचे बोलले जात आहे
    एकंदरीत पाहता ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच्यासोबत सत्ता स्थापन केल्यामुळे भारतीय जनता पार्टीचे
    (BJP)कार्यकर्ते नाराज आहेत तर आपल्याला महायुतीमध्ये सन्मान जनक वागणूक मिळत नसल्याचा आरोप हे
    राष्ट्रवादी काँग्रेसचे(Nationalist Congress Party) कार्यकर्ते करत आहेत व पुढे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये
    आपल्याला कमी जागा महायुतीने मिळतात की काय यामुळे संभावित जागा वाटपाच्या फॉर्मुल्यामुळे सुद्धा
    राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार नाराज असल्याचे बोलले जात आहेत आता पुढे पहावे लागेल की अजित
    दादा पवार(Ajit Dada Pawar) विधानसभेच्या आधी कुठला मोठा निर्णय घेतात की महायुतीमध्येच राहून विधानसभेची
    निवडणूक लढवतात

    Post Views: 342
    Ajit Dada Pawar bjp devendra fadvanis Eakntha Shide Nationalist Congress Party Navab Malik Tanaji Sawant
    Add A Comment

    Leave A Reply Cancel Reply

    जाहिरात
    TOP NEWS

    सोनखेड येथील ठाकूर दाम्पत्य वर झाली स्वामींची कृपा

    February 8, 2024924 Views

    नांदेड लोकसभा मतदारसंघातील 1952 ते 2019 पर्यंतचे सर्व खासदार

    March 17, 2024881 Views

    MILLETS:आहारात भरडधान्याचा वापर करा रोगराईला दूर ठेवा

    September 27, 2024365 Views

    जर तुम्ही टोल नाक्याच्या २० कमी मध्ये राहत असाल तर तुम्हाला टोल टॅक्स द्यायची गरज नाही

    September 11, 2024558 Views

    गुडघेदुखीचा त्रास का होतो?कारण व इलाज

    September 7, 2024683 Views
    जाहिरात
    About
    About

    संकल्प टुडे हे आपल्याला बातमी वेगळया अँगल दाखवेल पत्रकारितेचा
    अनुभव असलेली टीम हलक्या फुलक्या शब्दा मध्ये बातमी सांगेल संतोष पवार यांना १५ वर्ष पत्रकारितेचा अनुभव या वैचारिक लिखाणाने बातम्यानची व विचारांच्या भट्टीतून सोन तर चमकणारच

    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    POPULAR NEWS

    सोनखेड येथील ठाकूर दाम्पत्य वर झाली स्वामींची कृपा

    February 8, 2024924 Views

    नांदेड लोकसभा मतदारसंघातील 1952 ते 2019 पर्यंतचे सर्व खासदार

    March 17, 2024881 Views

    MILLETS:आहारात भरडधान्याचा वापर करा रोगराईला दूर ठेवा

    September 27, 2024365 Views
    CONTACT US

    ADDRESS
    Mamta Nivas, Teacher’s Colony Loha, Dist. Nanded, Maharashtra – 431708

    CHIEF EDITOR
    Santosh Vithalrao Pawar

    CONTACT NO.
    +91-7020560997

    EMAIL
    santoshpawar702056@gmail.com

    WEB ADD.
    www.sankalptoday.com

    130405
    Views Today : 483
    Who's Online : 1
    Language
    © 2025 www.sankalptoday.com. All rights are reserved. | Designed by www.wizinfotech.com
    • Home
    • About Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Contact Us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.