विधानसभेच्या निवडणुका जसं जशा जवळ येत आहेत तसं राजकीय घडामोडींना वेग येताना दिसत आहेत
अनेक बैठका व मतदार संघामध्ये चाचपणी सध्या चालू आहे महाराष्ट्र राज्याच्या राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा
जिल्हा आहे तो आहे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्याने महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री दिले यामध्ये काँग्रेसचे
ज्येष्ठ नेते कै .शंकररावजी चव्हाण व भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेचे खासदार माजी मुख्यमंत्री
अशोकराव चव्हाण(ashokrao chavan)या दोघांचा समावेश आहे .
या नांदेड जिल्ह्यावर आत्तापर्यंत काँग्रेस पक्षाचे वर्चस्व असल्याचे दिसून आले आहे काँग्रेसच्या अनेक
आमदार आणि खासदारांनी लोकसभा तसेच विधानसभेमध्ये आपली यशस्वी भूमिका पार पाडली आहे
पण लोकसभेच्या आधी माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण(ashokrao chavan) यांनी काँग्रेसला रामराम
करून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला व ते राज्यसभेचे खासदार देखील झाले यानंतर झालेल्या
लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघांमधून भारतीय जनता पार्टीला पराभवाचा सामना
करावा लागला काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर
यांचा पराभव केला व परत एकदा या जिल्ह्यावर काँग्रेसची पकड किती मजबूत आहे हे सिद्ध करून दाखवले पण
विधानसभेच्या तोंडावर दोन राजकीय घडामोडींनी विधानसभेचे चित्र काही प्रमाणात बदलले आहेया दोन घडामोडी
कुठल्या त्या विषयावर चर्चा करूया
डॉक्टर मीनल ताई खतगावकर अपक्ष निवडणूक लढविणार(minal tai khatgaonkar)
(Dr. Meenal Tai Khatgaonkar will contest as an independent candidate)
कैलासवासी शंकराव चव्हाण यांचे जावई व अशोकराव चव्हाण(ashokrao chavan) यांचे दाजी माजी मंत्री
माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर हे नांदेड जिल्ह्यातील राजकारणातील एक मोठं नाव
शंकरराव चव्हाण यांच्यासोबत काम करत त्यांनी बिलोली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले तसेच नांदेड लोकसभेलाही
ते दोन वेळेस खासदार म्हणून विजयी झाले त्यांचा नांदेड जिल्ह्याच्या राजकारणावर मोठा प्रभाव आहे विशेष करून
मुस्लिम समाजामध्ये भास्करराव पाटील खतगावकर यांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे पण जेव्हा
अशोकराव चव्हाण(ashokrao chavan) काँग्रेसचे प्रदेशचे अध्यक्ष होते तेव्हा त्यांनी काँग्रेसला रामराम करून
भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यांच्यासोबतच त्यांच्या सुनबाई डॉक्टर मीनल ताई खतगावकर
(minal tai khatgaonkar) यांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला व त्या राजकारणात सक्रिय झाल्या .
मीनल ताई(minal tai khatgaonkar) या जिल्हा परिषद सदस्य होत्या त्यांचासुद्धा नांदेड जिल्ह्याच्या
राजकारणावर मोठा प्रभाव पाहायला मिळाला यानंतर अशोकराव चव्हाण(ashokrao chavan) यांनी आपल्या
आमदारकीचा राजीनामा देऊन भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला व लगेच त्यांना राज्यसभेची संधी मिळाली व
परत एकदा अशोकराव चव्हाण(ashokrao chavan) व भास्करराव पाटील खतगावकर हे दोघेही एका पक्षात
काम करू लागले पण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या दोघांमध्ये दुरावा आल्याचं काहीस चित्र पाहायला मिळालं
कारण होतं नांदेड लोकसभा मतदार संघासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मीनल ताई खतगावकर या
उमेदवारीसाठी इच्छुक होत्या पण नांदेड लोकसभा मतदारसंघांमधून प्रताप पाटील चिखलीकर हे त्यावेळेला खासदार होते
त्यामुळे पक्षश्रेष्ठीने त्यांनाच उमेदवारी देऊन त्यांच्यावर विश्वास ठेवला अशोकराव चव्हाण(ashokrao chavan)
व प्रताप पाटील चिखलीकर या दोघांमध्ये मोठे राजकीय वैर होते पण भारतीय जनता पार्टीमध्ये या दोघांनीही खांद्याला
खांदा लावून काम चालू केले तरीपण काँग्रेसच्या वसंतराव चव्हाण यांनी प्रताप पाटील चिखलीकर यांचा पराभव केला
पण उमेदवारी न मिळाल्यामुळे भास्करराव पाटील खतगावकर व मीनल ताई खतगावकर(minal tai khatgaonkar)
हे दोघेही नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या विधानसभेसाठी मीनल ताई खतगावकर यांच्याकडे कुठलाही
विधानसभा मतदारसंघ शिल्लक नाही कारण देगलूर बिलोली हा विधानसभा मतदारसंघ राखीव आहे व त्या लगतचा
नायगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार राजेश पवार हे आहेत ते सीटिंग
आमदार असल्यामुळे त्यांनाच उमेदवारी मिळेल हे स्पष्ट आहे यानंतर खतगावकर परिवार हा काँग्रेसमध्ये घर वापसी
करणार अशाही पद्धतीच्या बातम्या काही वर्तमानपत्रात आल्या पण नायगाव हे नांदेड लोकसभेचे खासदार वसंतराव चव्हाण
यांचा मतदारसंघ आहे त्यामुळे या मतदारसंघातून वसंतराव चव्हाण हे ज्याला म्हणतील त्यालाच उमेदवारी मिळेल व
वसंतराव चव्हाण यांच्या परिवारातून एखादा सदस्य हा विधानसभेसाठी उमेदवारी मिळू शकतो यामुळे
मीनल ताई खतगावकर (minal tai khatgaonkar)यांना नायगाव मतदारसंघातून उमेदवारी मिळणे कठीण दिसते
मीनलताई खतगावकर(minal tai khatgaonkar) यांच्या पुढील दुसरा पर्याय नांदेड उत्तर मतदारसंघ यामध्ये
मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे शिवसेना यांचे विद्यमान आमदार बालाजी कल्याणकर हे आहेत व शिवसेना
भारतीय जनता पार्टी यांची युती असल्यामुळे इथून मीनलताई खतगावकर यांना उमेदवारी मिळू शकत नाही
त्यांच्या पुढील दुसरा पर्याय नांदेड दक्षिण मतदार संघ इथून काँग्रेसचे मोहन अण्णा हंबर्डे हे विद्यमान आमदार आहेत
त्यांच्याविरुद्ध महायुती मधून निवडणूक लढविण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत येथे इच्छुकांची गर्दी फार मोठी आहे
इथून सुद्धा मीनलताई खतगावकर(minal tai khatgaonkar) यांना उमेदवारी भेटणे अवघड आहे त्यामुळेच
डॉक्टर मीनलताई खतगावकर(minal tai khatgaonkar) यांनी आज आंतरवाली सराटी येथे जाऊन
मनोज जरांगे पाटील(manoj jarange patil) यांची भेट घेतली व आपण अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक लढविणार असल्याचे घोषित केले
यामुळे हा खासदार अशोकराव चव्हाण(ashokrao chavan) व भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का मानला जात आहे
आमदार जितेश अंतापुरकर मुख्यमंत्र्याच्या भेटीला(MLA Jitesh Antapurkar visiting Chief Minister)
देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापुरकर(jitesh antapurkar) हे या मतदारसंघाचे
प्रतिनिधित्व करतात याआधी त्यांचे वडील या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते पण त्यांच्या निधनामुळे
रिक्त झालेल्या जागी जितेश अंतापुरकर(jitesh antapurkar)यांनी काँग्रेस पक्षाची उमेदवारी घेऊन सहज विजय
मिळविला जितेश अंतापुरकर(jitesh antapurkar) हे अशोकरावजी चव्हाण(ashokrao chavan) यांचे निकटवर्तीय
मानले जातात ज्या वेळेला अशोकरावजी चव्हाण(ashokrao chavan) यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला
त्याच वेळेला आमदार जितेश अंतापुरकर(jitesh antapurkar) सुद्धा त्यांच्या सोबत प्रवेश करतील असा अंदाज
राजकीय विश्लेषकांचा होता पण त्यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये काही प्रवेश केला नाही पण मागील महिन्यात झालेल्या
विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची काही मते फुटली व या ज्या आमदारांची मते फुटली त्यांना उमेदवारी न
देण्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले गेल्या आठवड्यामध्ये नाना पटवली यांनी नांदेड जिल्ह्याचा दौरा केला
याप्रसंगी जितेश अंतापुरकर(jitesh antapurkar) यांनी उमेदवारी मागितली नाही त्यामुळे जितेश अंतापुरकर(jitesh antapurkar)
हे भारतीय जनता पार्टीमध्ये जातील असा अंदाज होता पण आज त्यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची भेट घेतली व
प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या येऊ लागल्या की ते लवकरच शिवसेना शिंदे गटांमध्ये प्रवेश करतील यासंदर्भात
आमदार जितेश अंतापुरकर (jitesh antapurkar)यांच्या वतीने कुठल्याही पद्धतीचे वक्तव्य करण्यात आलेले नाही
पण ते शिवसेना शिंदे गटात जातील अशा पद्धतीचे चर्चा सध्या नांदेड जिल्ह्यामध्ये चालू आहे त्यामुळे हा काँग्रेस
पक्षाला एक मोठा धक्का म्हणता येईलतसेच भारतीय जनता पार्टीला देखील हा मोठा धक्का मानला जाईल कारण
जितेश अंतापुरकर(jitesh antapurkar) हे अशोकराव चव्हाण(ashokrao chavan) यांचे निकटवर्तीय मानले जातात
पण त्यांनी भाजपा ऐवजी शिवसेनेची जर वाट धरली तर हा अशोकराव चव्हाण(ashokrao chavan) यांना सुद्धा एक
मोठा धक्का मानला जाईल आता पाहणे हे महत्त्वाचे ठरेल की आमदार जितेश अंतापुरकर(jitesh antapurkar) नेमका
काय निर्णय घेतात
एकंदरीत या घडलेल्या घडामोडींमुळे राजकीय चर्चांना मात्र मोठे उदान आले आहे व खतगावकर परिवाराने घेतलेला हा
निर्णय नायगाव तसेच नांदेड जिल्ह्यातील राजकारणाची समीकरणे मात्र बदलणार आहे जर मनोज जरांगे पाटील(manoj jarange patil) यांनी
डॉक्टर मीनलताई खतगावकर(minal tai khatgaonkar) यांना खरोखरच पाठिंबा दिला तर एकवटलेला मराठा समाज
हा जर मीनल ताई खतगावकर यांच्या बाजूने उभा राहिला तर त्या सहज विजयी होतील कारण नायगाव मतदार संघामध्ये
मोठ्या प्रमाणात मराठा तसेच मुस्लिम समाजाचे मतदान जास्त आहे व मुस्लिम समाजातील मतदारांवर
भास्करराव पाटील खतगावकर यांचा प्रभाव जास्त आहे त्यामुळे ही निवडणूक मीनलताई खतगावकर(minal tai khatgaonkar)
यांना सोपी जाऊ शकते
तसेच आमदार जितेश अंतापुरक(jitesh antapurkar)र यांनी जर शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला तर महायुतीला ही जागा
सोपी जाऊ शकते कारण आमदार जितेश अंतापुरकर(jitesh antapurkar) यांचा या मतदारसंघावर चांगला प्रभाव आहे व
या मतदारसंघावर त्यांची पकड मजबूत आहे
मीनल ताई खतगावकर अपक्ष निवडणूक लढविणार /आ.जितेश अंतापूरकर शिवसेनेच्या वाटेवर ?
नांदेड जिल्हयातील राजकारणाला नवीन वळण
Add A Comment