विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (RAJ THAKARE) यांनी
एका बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली व लोकसभेला
मनसेने महायुतीला पाठिंबा दिला होता पण विधानसभेला मनसे काय भूमिका घेणार याकडे
सर्वांचे लक्ष होते
मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे(RAJ THAKARE) यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी येणाऱ्या
विधानसभेच्या निवडणुकी संदर्भात चर्चा केली या चर्चेदरम्यान काही मुद्द्यांवर राज ठाकरे(RAJ THAKARE) व
पदाधिकाऱ्यां मध्ये एक मत झाले याप्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलताना मनसेचे नेते बाळा नांदगावकर
यांनी सांगितले की खालील मुद्द्यावर या बैठकीमध्ये चर्चा झाली
1) महायुती व महाविकास आघाडी यांच्यामध्ये जागावाटप निश्चित नाही
(Seat allocation between Mahayuti and Mahavikas Aghadi is not certain)
नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला महाराष्ट्रामध्ये मोठा फटका बसल्याचे
पाहायला मिळाले तर महाविकास आघाडी ला जास्त फायदा झाला आहे पण या दोन्ही पक्षांमध्ये सध्याची
परिस्थिती पाहता यांच्यामध्ये लवकर जागे वाटपाचा निर्णय होणे शक्य दिसत नाहीये व मी कोणाच्या
दारामध्ये मला तुमच्या सोबत घ्या व मला एवढ्या जागा द्या असं म्हणायला जाणार नाही असे स्पष्ट वक्तव्य
राज ठाकरे यांनी केले
2)मनसे विधानसभा स्वबळावर लढवणार (MNS will contest the Assembly on its own)
येणाऱ्या विधानसभेमध्ये मनसे कोणासोबत ही युती करणार नाही व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चाचपणी चालू आहे
व यानंतर मनसे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 200 ते 225 जागा लढविणार असल्याचे राज ठाकरे यांनी आज स्पष्ट
केले मागील विधानसभेला सुद्धा राज ठाकरे(RAJ THAKARE) यांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती पण त्यांना फक्त
एकाच जागी यश आले यावेळी परत एकदा राज ठाकरे 200 जागा लढविणार आहेत त्यामुळे या मत विभाजनाचा
फायदा कोणाला होतो हे आता पहावं लागेल कारण मनसेने जर महाविकास आघाडीचे मते फोडली तर त्याचा
सरळ फायदा हा महायुतीला होईल ही सुद्धा शक्यता नाकारता येणार नाही तसेच मुंबईप्रमाणे मराठवाड्यात देखील
महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले आता विधानसभा निवडणुकीमध्ये जर मनसे मी या जागा लढविल्या व
त्यातल्या दोन-तीन जागा जरी निवडून आल्या तरी सुद्धा महाविकास आघाडीला हा खूप मोठा फटका बसेल
3)मराठी माणूस आपली वाट पाहत आहे राज ठाकरे (Marathi man is waiting for us Raj Thackeray)
लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी व त्यामधील घटक पक्ष उद्धव ठाकरे यांच्या गटाला मिळालेले
मतदान हे त्यांचे नसून भारतीय जनता पार्टीवर नाराज असलेल्या लोकांनी उद्धव ठाकरे यांना मतदान केले आहे
यामुळे मराठी माणसाच्या मनामध्ये आत्ता चाललेल्या राजकारणामुळे मनसे बद्दल सकारात्मक भूमिका आहे व
त्यामुळे आपल्याला जो मराठी माणूस आपली वाट पाहत आहे त्याच्याकडे पोहोचणे जरुरी आहे
लोकसभेच्या मतदानामध्ये उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठ्या प्रमाणात मतदान मिळाले मुंबई नेमकं कोणाची याचं
उत्तर लोकसभेला मिळालं पण याकडे पाहताना राज ठाकरे(RAJ THAKARE) यांनी सांगितले की भारतीय जनता पार्टीवर नाराज
असलेला मतदार हा उद्धव ठाकरे यांच्याकडे गेला त्यामुळे आपण या गोष्टीकडे लक्ष देऊन मराठी माणसासाठी
आपण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उतरण अनिवार्य आहे असं त्यांना वाटतं पण उद्धव ठाकरे यांना मानणार आहे
खूप मोठा वर्ग हा मुंबई व परिसरात असल्याचे गेल्या निवडणुकीमध्ये दिसून आले
पक्षांमध्ये झालेली एवढी मोठी पडझड तरीपण उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा नवीन जोमाने कामाला लागले व
मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी ते प्रचंड मेहनत घेतली व त्यांना त्या प्रमाणामध्ये यश सुद्धा येताना दिसले
4)उद्धव ठाकरे यांना जनतेने स्वीकारले नाही (People did not accept Uddhav Thackeray)
महाविकास आघाडी मुंबई तसेच महाराष्ट्रामध्ये आलेले यश हे उद्धव ठाकरे यांचे नसून नरेंद्र मोदी व
भारतीय जनता पार्टी यांच्या विरोधातले मतदान हे आघाडीला पडले आहे कोणाच्याही चेहऱ्याकडे बघून हे
मतदान झालेले नाही महाराष्ट्रातील जनता ही आपली वाट पाहत आहे त्यामुळे आपण सर्वांनी जोमाने कामाला
लागावं दुसरा कुठला पर्याय नव्हता म्हणून मराठी माणसाने आघाडीला मतदान केले आपण आता नवीन पर्याय
उभा करून घेऊ असे याप्रसंगी राज ठाकरे यांनी सांगितले
कारण कुठलेही असो पण राज ठाकरे यांनी घेतलेली ही भूमिका व ती या वेळेला या विषयी प्रसार माध्यमांमध्ये
वेगळ्या प्रकारची चर्चा चालू आहे त्याचे कारण आहे नरेंद्र मोदी यांचा झालेला शपथविधी मनसेने ला न बोलविणे
लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला साथ देऊन सुद्धा साध नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीसाठी
निमंत्रण सुद्धा राज ठाकरे यांना देण्यात आलं नव्हतं त्यामुळे राज ठाकरे(RAJ THAKARE)हे नाराज असल्याची चर्चा होतीच तसेच
मुंबईमध्ये आलेले उद्धव ठाकरे यांच्या गटाला यश लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या
गटाला मोठे यश येताना दिसले आणि याचाही काही परिणाम हा आज मनसेच्या बैठकीमध्ये दिसला कारण
महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांचे खरे राजकीय विरोधक म्हणून राज ठाकरे(RAJ THAKARE) यांच्याकडे पाहिले जाते व महायुतीने
देखील लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो मुंबईमधील मतदार मराठीला मतदार हा ठाकरे घराण्यावर त्यांचे नितांत
प्रेम आहे व आपल्याकडेही एक ठाकरे असावा या विचाराने महायुतीने राज ठाकरे(RAJ THAKARE) यांना स्वतः सोबत घेतले पण
राज ठाकरे यांना किमान एक ते दोन जागा मुंबईमधील देतील असं वाटत होतं पण महायुतीने तसे केले नाही व
मुंबईत नव्हे तर महाराष्ट्रात मनसेला एकही जागा लोकसभेसाठी सोडली नाही तरीसुद्धा jराज ठाकरे(RAJ THAKARE) यांनी
महायुतीचा प्रचार करण्यामध्ये आघाडी घेतली त्यानंतर त्यांना साध शपथविधीला सुद्धा बोलवलं गेलं नाही
मनसेच्या स्थापनेनंतर ते आजपर्यंत राज ठाकरे यांना फक्त पहिल्याच निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात यश येताना
दिसले त्यामध्ये त्यांनी 13 आमदार निवडून आणले होते पण त्यानंतर राज ठाकरे(RAJ THAKARE) यांचा व मनसेचा आलेख हा खाली
जाताना पाहायला मिळाला मागील विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेला फक्त एकच जागा निवडून आणता आली
व त्याआधीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेला फक्त एकच जागा निवडून आणता आली त्यामुळे येणारी
विधानसभेची निवडणूक ही राज ठाकरे यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई असेल यात काही प्रश्न नाही पण राज ठाकरे
पक्षाची झालेली पडझड व यातून पक्षाला कशी नवी उभारी देतात हे पहावं लागेल मुंबईमध्ये असलेल्या विधानसभेच्या
जागा या जागांवर राज ठाकरे यांचे विशेष लक्ष राहील व इथून राज ठाकरे(RAJ THAKARE) काही निर्णय जागा निवडून आणू शकतात का?
हे आता आपल्याला पाहावं लागेल
तसेच आपण महायुतीचा विचार केला तर यामध्ये शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पार्टी या तीन
पक्षांमध्ये जागा वाटपावरून मोठ्या प्रमाणात मतभेद होऊ शकतात व या तिघांमध्ये मनसेला नेमक्या किती व कोणत्या
जागा महायुती सोडणार ते सुद्धा खूप अवघड दिसत आहे कारण यांच्या विद्यमान आमदारांची संख्या ही 200 च्या
आसपास आहे त्यामुळे उर्वरित जागांपैकी किती जागा मनसेला महायुती द्यायला तयार होईल काही खूप मोठा प्रश्न आहे
कारण सध्याच्या स्थितीला मनसेकडे फक्त एकच आमदार आहे या गोष्टीचा विचार करता मनसेला केवळ मात्र दोन नाही
तर तीन जागेवर भा ज पा जागा देणार नाही असंच काही चित्र विधानसभेला राहू शकते
अजून विधानसभा निवडणुकीसाठी दोन ते तीन महिन्याचा कालावधी बाकी आहे त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये काय
होईल हे आता कोणालाही कळणार नाही कदाचित मनसे ही महायुती सोबत परत एकदा युती करू शकते कारण कोकण
पदवीधर मतदार संघामधून मनसेने अभिजीत पानसे यांना उमेदवारी जाहीर केली व भाजपाच्या बड्या नेत्यांशी बोलल्यानंतर
त्यांनी आपले उमेदवार उभा न करण्याचा निर्णयही घेतला त्यामुळे मनसे विधानसभेला महायुतीचा घटकपक्ष सुद्धा होऊ
शकते आता पहावं लागणारे ही खरोखरच राज ठाकरे एकला चलो रे म्हणत एकटे चालतात की महायुती किंवा महायुती
विकास आघाडीमध्ये सामील होतात हे पुढील काही दिवसांमध्ये स्पष्ट होईलच पण जर मनसे आपल्या भूमिकेवर ठाम राहिली
तर मग मात्र महाराष्ट्रामध्ये बहुतांश मतदारसंघांमध्ये तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळेल
मनसे विधानसभा स्वबळावर लढविणार -राज ठाकरे
विधानसभेला मनसे चे इंजिन एकटं धावणार
Add A Comment