नवी दिल्ली – रुपेरी पडद्यावर संवाद फेक करणारे अभिनेते आपल्या डायलॉग
ने सर्वांच्या मनात घर करतात पण रुपेरी पडद्यावरील अभिनेते मात्र संसदेमध्ये
कुठलाही डायलॉग बोलताना दिसत नाहीत
लोकसभेचा कार्यकाळ जवळपास संपत आलाय काही खासदार असे आहेत की
ज्यांनी पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एक दोन प्रश्न सोडले तर ते कधीही संसदेमध्ये बोलले नाहीत
या यादीमध्ये पहिलं नाव आहे पंजाब मधील गुरुदासपूर येथून भारतीय जनता पार्टीच्या
तिकिटावर निवडून आलेले अभिनेते सनी देओल यांनी फक्त एकदा एकच प्रश्न विचारला बाकी
पाच वर्ष मात्र गपचूप बसून राहिले तसेच तृणमूल काँग्रेस मधून राज्यसभेवर गेलेले
प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हे सुद्धा राज्यसभेत एकदाही बोलले नाही त्यांचा एक डायलॉग
खूप गाजला आहे खामोश जेथे प्रश्न विचारायचे तेथे मात्र शत्रुघन सिन्हा
खामोश असल्याचे पाहायला मिळालं
एकंदरीत ज्या अभिनेत्यांच्या अभिनय कौशल्याकडे पाहून आपण त्यांना मत
देतो पण प्रत्यक्षात मात्र ते असे वागू लागल्यावर मात्र दुःख होते
ज्या कामासाठी लोकांनी आपल्याला संसदेत पाठवले ते काम प्रत्येकाने इमानदारीने
करावे हीच सर्वसामान्य मतदारांची अपेक्षा असते