नवी दिल्ली -संसदेच्या
अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या
अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधान
नरेंद मोदी यांनी यावेळी पंतप्रधान मोदींनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.
तसेच, आपल्या भाषणादरम्यान विकसित भारताचा पाया
मजबूत करण्यासाठी मोदी 3.0 ची घोषणा करत आगामी
पाच वर्षाचा रोडमॅप सांगितला.
आमच्या सरकारची तिसरी टर्म आता दूर नाहीये आम्ही सत्तेत म्हणजेच
३.० आल्यावर विकासाचा वेग हा आतापेक्षा निश्चित जास्त असेल
तिसऱ्या टर्म मध्ये मेडिकल कॉलेज आय आय टी ची संख्या वाढेल व
ए आय टेक्नॉलॉजी वापरण्यावर आमच्या सरकारचा भर असेल
येत्या पाच वर्षांमध्ये बुलेट ट्रेन भारतातील लोकांना मिळेल
व पाच वर्षा सर्व घरांमध्ये पाईप द्वारे गॅसचा पुरवठा करण्यात येईल
अशी ही घोषणा केली
गरिबांसाठी सुरू केलेल्या कल्याणकारी योजना या अशा सुरू राहतील
यामध्ये मोफत धान्य मोफत औषध उपचार मोफत पक्की घरे
अशा योजना अजून प्रभावीपणे राबविल्या जातील पाच वर्षात
प्रत्येक राज्याचा सर्वांगीण विकास हे आमचे ध्येय आहे कुठलेही राज्य मागे राहता कामा नये
यासाठी केंद्र शासनाने एक पाऊल टाकले तर दुसरे पाऊल राज्य शासनाने टाकलेच पाहिजे
दोघांनी मिळून जर केले तर देशाचा व राज्याचा विकास होईल
मूलभूत गरजा सर्वांच्या पूर्ण करणे ही आमची प्राथमिकता आहे
प्रत्येक भारतीयांचे जीवनमान हे चांगले असावे त्याची उंची उंची वाढावी यासाठी आम्ही प्रयत्न करू
याप्रसंगी बोलताना नरेंद्र मोदी यांनी विरोधकांचा चांगला समाचार घेतला
आम्ही 25 कोटी लोकांना गरिबी रेषेच्या बाहेर आणले व 80 टक्के लोकांना
मोफत अन्नधान्य दिले यावर सुद्धा विरोधकांनी माझ्यावर टीका केली
पण जोपर्यंत गरीब जनता ही दुसरा टप्पा ओलांडणार नाही तोपर्यंत या योजना अशाच सुरू ठेवाव्या लागतील
विरोधकांनी विरोध करावे काँग्रेसला किंवा चाळीस-पन्नास जागा याव्यात असा टोलाही त्यांनी लगावला
Add A Comment