15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले हा दिवस प्रत्येक भारतीयाच्या आयुष्यातील सर्वात आनंदी दिवस असतो शेकडो वर्षाच्या गुलामगिरीनंतर लाखो शहिदांचे बलिदानानंतर आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले आहे प्रथम लाल किल्ल्यावर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा ध्वज लाल किल्ल्यावर फडकवला व गुलामगिरीतून आपण मुक्त झालो अशी घोषणा केली
पण आपल्या स्वातंत्रता संग्रामामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली ती भारत देशाच्या झेंड्याने साधारणतः चार वेळेला भारताचा झेंडा हा स्वतंत्रता पूर्वी बदलला गेला हा कसा बदलला गेला व यात काय विशेष होते याविषयी आपण सविस्तर चर्चा करूया
1906 ला पहिला झेंडा(First flag in 1906)
तसं पाहायला गेलं तर स्वातंत्र्यापूर्वी असलेल्या अनेक संस्थाने अस्तित्वात होती त्यांचे प्रत्येकाचे आपले ध्वज वेगवेगळे होते पण प्रथम देशाचा म्हणून एक ध्वज तयार केला गेला या ध्वजामध्ये तीन समान पट्ट्या होत्या ज्यामध्ये सर्वात वरची पट्टी ही हिरव्या रंगाची होती मधली पट्टी ही पिवळ्या रंगाची होती खालची पट्टी ही भगव्या रंगाची होती तसेच यात अगदी वरच्या पट्टीमधून म्हणजेच हिरव्या पट्टीमध्ये कमळ या फुलाचे चिन्ह होते या चिन्हांची संख्या ही आठ होती तसेच या ध्वजामधील दुसरा रंग म्हणजे पिवळा रंग या पिवळ्या रंगांमध्ये वंदे मातरम हे घोषवाक्य लिहिलेले होते तसेच खालच्या पटीतील म्हणजेच भगवा रंगांमध्ये चंद्र व सूर्य हे दोन चिन्ह रेखाटलेली होती हा ध्वज 1906 ला आपण स्वीकारला होता मागील काही वर्षांपूर्वी आलेल्या आर आर आर या चित्रपटामध्ये याच पद्धतीचा ध्वज हा दाखविला गेला होता कारण या चित्रपटाची कहाणी स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीची होती साधारणता 1906 मधील होती त्यामुळेच हात ध्वज या चित्रपटात दाखविण्यात आला होता हाच आपण आपला ध्वज म्हणून भारतीयांनी अकरा वर्षे वापरला पण अकरा वर्षानंतर ब्रिटिश सरकारच्या दबावामुळे या ध्वजाच्या जागी दुसरा ध्वज तयार करण्यात आला
1917 ला दुसरा ध्वज(Another flag in 1917)
1906 ला तयार केले गेला वंदे मातरम घोषवाक्य असलेला वच बदलून दुसरा ध्वज तयार करण्यात आला या ध्वजा मध्ये हिरवा व भगव्या रंगाच्या नऊ पट्ट्या होत्या व बजाच्या वरच्या बाजूला ब्रिटिशांचा झेंडा होता या झेंड्याच्या बाजूला अर्ध चंद्राची कोर व त्यावर एक तारा अशा पद्धतीचे एक चिन्ह होते व तसेच या ध्वजामध्ये सात चांदण्या चे चिन्ह होते अशा प्रकारचा हा ध्वज पण या ध्वजामध्ये ब्रिटिशांचा झेंडा असल्यामुळे त्या वेळच्या क्रांतिकार्यांना हा झेंडा आवडला नाही म्हणून हा ध्वज फक्त चार वर्ष राहिला त्यानंतर 1921 मध्ये तिसरा ध्वज आला
1921 ला तिसरा ध्वज(Third flag in 1921)
हा ध्वज आंध्र प्रदेश मधील क्रांतिकारी पिंगली व्यंकय्या यांनी तयार केला होता ब्रिटिशांचा ध्वजाचे चिन्ह असलेला बदलून लवकरच तिसरा ध्वज तयार केला व यामध्ये तीन रंगाच्या समान पट्ट्या होत्या यात सर्वात वरची पट्टीमध्ये पांढरा रंग होता व त्या खालच्या दुसऱ्या पट्टीमध्ये हिरवा रंग होता एकदम खालच्या पट्टीमध्ये भगवा रंग होता व या ध्वजामध्ये बरोबर मध्ये चिन्ह एक चरखा निळ्या रंगाने काढला होता ज्या चरख्याचे चाक हे डाव्या बाजूला होते चरखा चिन्ह वगळता यावर अन्य कुठलेही चिन्ह नव्हते या रंगांमध्ये भगवा रंग हा हिंदू धर्माचे प्रतीक आहे तर हिरवा रंग हा मुस्लिम धर्माचे प्रतीक आहे याबरोबरच पांढरा रंग हा बाकी सर्व धर्माचे प्रतीक आहे हा ध्वज दहा वर्ष आपण वापरला पण 1931 मध्ये हा ही ध्वज बदलण्यात आला
1931 ला चौथा ध्वज(Fourth flag in 1931)
1931 पर्यंत भारतात मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्यासाठी चळवळ उभी राहिली होती व या चळवळीला बळ देण्याचे काम आपले ध्वज करत होते 1921 ला असलेल्या ध्वजामध्ये काही बदल करून एक नवीन ध्वज तयार करण्यात आला
यामध्ये सुद्धा तीन समान आकाराच्या पट्ट्या होत्या व यामध्ये सर्वात वर भगव्या रंगाची पट्टी होती तर मधल्या पट्टीचा रंग हा पांढरा होता व सर्वात खालच्या पट्टीमध्ये हिरवा रंग होता 1921 चा ध्वज व 1931 यामध्ये सामने एकच होते की या दोन्हीही ध्वजावर चरख्याचे चिन्ह रेखाटलेले होते पण 1921 आणि 1931ध्वजा वरील चिन्हांमध्ये एकच फरक होता की 1921 च्या ध्वजावरील चरख्यामध्ये चरख्याचे चाक हे डाव्या बाजूने होते तर 1931 च्या ध्वजामध्ये असलेल्या चरख्याच्या
चिन्हाचे चाके उजव्या बाजूला होते
1947 ला तिरंगा झेंडा(Tricolor flag in 1947)
22 जुलै 1947 ला संविधान सभेची बैठक झाली व या बैठकीमध्ये आपला तिरंगी झेंडा हा राष्ट्रीय ध्वज म्हणून घोषित केला या झेंडामध्ये समान तीन रंगाच्या पट्ट्या ज्यामध्ये वरच्या बाजूला भगवा रंग मध्ये पांढरा रंग व खालच्या पट्टीत हिरवा रंग व त्यावर निळ्या रंगाने अशोक चक्र आहे 15 ऑगस्ट 1947 रोजी लाल किल्ल्यावर फडकला
ध्वजारोहण व ध्वज फडकवणे यात काय फरक आहे
(What is the difference between flag hoisting and flag Unfurling?)
15 ऑगस्ट ला आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो या दिवशी आपण ध्वजारोहण करतो म्हणजे ज्या खांब्यावर झेंडा फडकवायचा आहे त्या खांब्याला खाली ध्वज बांधून दोरीच्या साह्याने हा झेंडा वर नेला जातो व खांब्यावर तो दोरीच्या साह्याने वर नेला जातो व फडकवला जातो याच ध्वजा रोहनाला इंग्रजीमध्ये (flag hosting)असे म्हणतात 1947 ला प्रथम इंग्रजांचा ध्वज खाली उतरून त्यानंतर आपला तिरंगी झेंडा हा फडकवला गेला तो हा दिवस याच दिवशी इंग्रजांना आपला देश सोडून स्वतःच्या देशांमध्ये पळून जाऊ लागले होते म्हणून या दिवशी आपण ध्वजारोहण करतो व हा मान भारताच्या पंतप्रधानांचा असतो कारण 1947 ला जेव्हा आपल्या स्वातंत्र्य मिळाले तेव्हा राष्ट्रपती हे पद अस्तित्वात नव्हते म्हणून हा मान पंतप्रधान यांना दिला जातो
26 जानेवारी झेंडा फडकवला जातो
भारताला स्वातंत्र्य मिळवून देखील आपली राज्यघटना तयार नव्हती म्हणून अडीच वर्ष ब्रिटिशांच्या कायद्याप्रमाणे आपला देश चालला 26 जानेवारी 1950 रोजी जेव्हा आपली राज्यघटना अस्तित्वात आली तो हा दिवस म्हणून या दिवशी आपल्या देशामध्ये झेंडा फडकवला जातो कारण याच दिवशी आपल्याला सर्व अधिकार हे संविधानाने दिले होते त्यामुळेच या दिवशी झेंडा फडकला जातो झेंडा आधीच खांब्याला वर बांधलेला असतो व तो फक्त दोरीच्या साह्याने झेंड्याची गाठ सोडून तो हवेत मोकळा केला जातो याला झेंडा फडकवणे असे म्हणतात म्हणजेच इंग्रजीमध्ये (flag Unfurling) असे म्हणतात
26 जानेवारी 1950 रोजी आपले संविधान अस्तित्वात आले व त्याबरोबरच राष्ट्रपती पद हे देशातील सर्वोच्च पद झाले व या पदावर डॉक्टर राजेंद्र प्रसाद या देशाचे प्रथम राष्ट्रपती म्हणून विराजमान झाले त्यामुळे 26 जानेवारीला झेंडा फडकवायचा मान हा राष्ट्रपतींचा असतो राजपथ येथे हा झेंडा फडकवायचा कार्यक्रम होतो
ध्वजवंदन संहिता 2002(Flag Code 2002)
या संहितेमध्ये तिरंगा फडकवणे व तू खाली उतरवणे यासाठी काही नियमावली शासनाने घालून दिलेली आहे
१)ज्या ठिकाणी ध्वज फडकवायचा आहे ती जागा योग्य असावी जागा सर्वांना दिसणारी असावी
२)जर तिरंगा शेजारी दुसरा एखादा ध्वज फडकवायचा असेल तर त्याची जागाही तिरंगा पेक्षा खाली असावी
३)तिरंगा फडकवताना बिगुल चा वापर करावा
४) जर कोणत्याही कारणामुळे तिरंगा फाटला असेल तर तो नियमानुसार नष्ट करावा
५)तिरंगा हा आयात आकृती असावा
६) तिरंगा ध्वजाचे रुंदी व लांबी याचे गुणोत्तर ३:२असा असावा
७)एखाद्या मंचावर ध्वजारोहण होत असेल तर वक्त्याने समोर पहावे व्व ध्वजाच्या उजव्या बाजूला थांबावे
८)ध्वजामध्ये असलेल्या अशोक चक्रामध्ये 24 आरे असावेत
९)कोणत्याही परिस्थितीमध्ये ध्वज हा जमिनीला लागता कामा नये
१०)2002 मध्ये ध्वज संहिता लागू होण्याच्या आधी 26 जानेवारी व 15 ऑगस्ट या दिवशी सामान्य लोक तिरंगा फडकवत नव्हते पण 2002 च्या नवीन नियमानंतर सामान्य व्यक्ती मर्यादित स्वरूपात केव्हाही तिरंगा झेंडा फडकवू शकतो
राष्ट्रध्वज हा नेहमी सूर्यास्ताच्या आधी उतरावा
राष्ट्रध्वज उतरताना घाई गडबड करू नये
राष्ट्रध्वज व्हा खाली पडू नये त्याला माती लागू नये याची काळजी घेतली पाहिजे व त्याची व्यवस्थित घडी करून तो योग्य जागी ठेवला पाहिजे
१९०६ ते १९४७ पर्यंतचे ध्वज व ध्वजारोहन व ध्वज फडकवणे यात फरक काय आहे?
१५ ऑगस्ट ला ध्वजारोहण तर २६ जानेवारीला ध्वज फडकविला जातो
Add A Comment